Friday 23 February 2018

हरियाणा सृजन उत्सव - 2 में , 25 साल की रंग - सृजन के अनुभव , पर संवाद करेंगे रंग - सिद्धान्तकार मंजुल भारद्वाज...



25 वर्ष , जिसे हम कहते है .. एक चौथाई सदी ... इस 25 साल की, यात्रा को जीने वाला रंगकर्मी ..विश्व को बेहतर और सुंदर बनाने की प्रतिज्ञा लेकर... जीवन में रंगकर्म से विश्व को रचनात्मक दृष्टि देने के उद्देश से " थियेटर ऑफ़ रेलेवंस " नाट्य सिद्धांत का सूत्रपात करके ....रंगमंच को जीवन से जोड़ना .. साथ ही केवल मनोरंजन ही नाटक नहीं हो सकता... नाटक का उद्देश “ परिर्वतन " व्यक्ति के विचार में , अपने परिवार में , अपने समाज में , अपने गाँव में , अपने जिले में , अपने शहर में , अपने राज्य में, अपने देश में और अपने विश्व में....यह जुड़ाव व्यक्ति के विचारोंसे जुड़कर उसे व्यापक दृष्टिकोण देकर विश्व से जोड़ना... विश्व में सकारात्मक दृष्टि निर्माण होने के उद्देश से रंग- सिद्धांतकार मंजुल भारद्वाज 12 अगस्त, 1992 से समाज के अलग- अलग स्तर पर काम कर रहे है !


इस 25 साल की यात्रा में , रंगकर्म से समाज में परिवर्तन उन्होंने लाया ...संघर्ष यात्रा में जितना संघर्ष बढ़ता गया ...उतना ही उनको , वह संघर्ष उनके बदलाव की, प्रक्रिया की और ले गया ...विपरीत परिस्थिति और हालात से गुजरकर उन्होंने तत्व को निर्माण किया “ थियेटर ऑफ़ रेलेवंस " नाट्य सिद्धांत जहाँ रंगकर्म ध्येय के साथ किया जाता है ! “ मकसद ही धन ” यह सूत्र लेकर जब वह समाज में नाट्य सिद्धांत के साथ गये ...तब, उन्होंने नाटक के विचार की प्रतिबद्धता से समाज में परिवर्तन लाया...बात है, उस समय की , जब बाबरी मस्जिद का ढांचा गिरा दिया गया था ! तब देश में दंगा उठे थे ...मुम्बई दंगे में जल रही थी .. मंजुल जी के विचार के प्रतिबद्धता ने उस समय दंगों में जाकर रंगकर्म किया .. मानवता , संवेदनाओंको जागृत किया .. नाटक के दृश्य विचार के रूप में इस तरह लोगों के मन को भा गये .. वहाँ पर संवेदनाएँ जी उठी .. हाथ से हथियार गिर गए... एक दूसरे के प्रति प्रेम का निर्माण कर पाएं ...इस तरह के बदलाव के माध्यम से " थियेटर ऑफ रेलेवन्स " की शुरुवात ने परिवर्तन का बीज बोया ..वह बीज आज 25 साल का वृक्ष बनकर खड़ा है ! " थियेटर ऑफ रेलेवन्स " नाट्य सिद्धान्त ने परिवर्तन का सूत्र लेकर समाज के विभिन्न स्तर पर काम किया ... बच्चोंको को शिक्षा लेने के प्रति आदर करना, स्त्री - पुरुष एक दूसरे का सन्मान करना , लिंग भेद को नष्ट करना समाज के विकृतियों को नष्ट करना उसके लिए नए विचार का निर्माण , महिला के प्रति सन्मान का भाव निर्माण हो उसके लिए कार्य करना ... बाल मज़दूरों को शिक्षा की और ले जाना ... धर्म - जात के मानसिकता को निकालना और मनुष्य को मनुष्य के नजरिये से देखना ... रंगकर्म को जीवित रखने के लिए रंगकर्मियों को सक्षम करना ... बात यहाँ पर रुकती नहीं है ... देश और विदेश में जाकर "थियेटर ऑफ रेलेवन्स " के तत्वों से विदेश में " हमारे देश के विचारों के बीज को बोना " और सक्षम भारत का अध्याय लिखना ...राजनीति को नई दृष्टि से देखने के लिए राजनीति की पवित्र व्याख्या निकालना जहाँ से राजनीति के उद्देश्य के बारे में जनता को राजनीति के प्रति सन्मान होना...
व्यक्तित्व विचारोंसे बनता है .. रंग- सिद्धान्तकार मंजुल भारद्वाज जी का व्यक्तित्व एक संस्थान के रूप में कार्य करता है...




कुरुक्षेत्र में होने जा रहे हरियाणा सृजन उत्सव में 23-24-25 को " रंग- सिद्धान्तकार मंजुल भारद्वाज " जी , 24 फरवरी, 2018 को सुबह 11:30 से 12:00 बजे , संवाद 25 साल की रंग - सृजन के अनुभव , पर संवाद करेंगे...देस हरियाणा द्वारा आयोजित हरियाणा सृजन उत्सव - 2 में , राजकीय वरिष्ठ माध्यमिक विद्यालय कुरुक्षेत्र के सभागार में (कुरुक्षेत्र विवि के गेट नं. 2 के साथ)...रू-ब-रू होंगे रंग....

रंगकर्मी
तुषार म्हस्के

Monday 19 February 2018

निसर्गातील वेगवेगळ्या रंगछटा रंगवणारी हि कार्यशाळा ..तुषार म्हस्के


जीवनात जगलेले अनुभव साध्य रूपाने नेहमीच बरोबर असतात.... जगलेल्या क्षणांचे मनन व चिंतन करत येणाऱ्या , भविष्यातील क्षणांना स्वतःच्या हाताने बनवण्यासाठी लागणारी दृष्टी थिएटर ऑफ रेलेवन्स सातत्त्याने मला देत आहे...


युद्ध भूमीवर सैनिक नियोजन करून जातात व  योग्य नियोजनाने युद्ध जिंकतात... जिंकलेले युद्ध , त्यात  मिळालेले यश टिकवून ठेवणे व नवीन नियोजन करणे.. हे खूप महत्वाचे होऊन जाते..हे योग्य नियोजन व त्याची कृती नाही केलीं तर जिंकलेले युद्ध आपण कधीही हारु शकतो .जिंकलेल्या क्षणांना एकत्र घेऊन ते क्षण कसे टिकवायचे,  त्याच बरोबर तो जिंकलेल्या अनुभवांचा साठा एकत्र घेऊन जाण्याची पद्धत , प्रक्रिया,  थिएटर ऑफ रेलेवन्स च्या  26 ते 30जानेवारी 2018 ला युसूफ मेहरअली सेंटर ,तारा,पनवेल येथे झालेल्या कार्यशाळेत मला अनुभवायला मिळाले...
या कार्यशाळेचे उत्प्रेरक रंगचिंतक मंजुल भारद्वाज..



व्यक्तीच्या अंतर्मनात सुरु होणारी प्रक्रिया व्यक्तीला बदलाच्या दिशेने घेऊन जाते... थियेटर ऑफ रेलेवंस एक प्रयोग शाळा आहे .. ही प्रयोगशाळा , व्यक्तीच्या अंतर्मनात घडत असणाऱ्या गोष्टीना सकारात्मक बदलाच्या दिशेने घेऊन जाते.. मनामध्ये तयार होणारे नकारात्मक विचारांचे बांध तोडून त्यांना सार्थक दिशा देण्याचे कार्य होते.
जीवन जगत असताना , अनुभवाची एक – एक पायरी चढत असताना , येणारे अनुभव व्यक्तीच्या व्यक्तीमत्वामध्ये गुणांची वाढ करत असते. जगत असताना  मिळालेले क्षण टप्याटप्याने अनुभवणे , व त्या गुणांना समजून ते व्यक्तीच्या आत नव्याने अंगीकारणे म्हणजेच व्यक्तीची व्यापकता ही  वाढत असते . थियेटर ऑफ रेलेवंस २५ वर्ष पूर्तीचा सोहळा पनवेल मध्ये १८, १९, २० डिसेंबर २०१७ ला पार पडला. ह्या अनुभवामध्ये आम्हा पाचही कलाकारांमध्ये वेगळीच सकारात्मक उर्जा आणि जग जिंकण्याच सामर्थ्य निर्माण झालेले . २१डिसेंबर २०१७  पासून ते २५जानेवारी २०१८  पर्यंतचा 36 दिवसांचा सर्वात मोठा अवधी निघून गेला होता. कार्यशाळेची सुरुवात हि , या जिंकलेल्या अनुभवाला पुन्हा अंगीकारण्या पासून झाली .



जसं  प्रेक्षकांनी नाटक पाहिल्यानंतर दिलेल्या अनुभवाच्या प्रतिक्रिया / प्रतिसाद पेपर वर लिहिण्यात आल्या. तो अनुभव मांडल्यानंतर समजले ... आपली एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे व आता  ही ओळख टिकवून ठेवणे  आपली नैतिक जबाबदारी आहे . मग , ते अनुभव टिकवण्यासाठी मी काय करतोय ? मी ते अनुभव लिहित  आहे का ? लिहिलेलं मी आत्मसात करत आहे का ? त्या पहिल्या दिवसाच्या प्रक्रियेमध्ये मला हे जाणवू लागले की.. अनुभवांना पुन्हा आत्मसात करण्याची प्रक्रिया माझ्या मध्ये  निर्माण होत आहे , त्याच क्षणी हवेची निर्मळ  झुळूक मला  स्पर्श करून गेली. ह्या अनुभवाला टिकवून ठेवण्यासाठी मी काय करतोय ? ... तर ह्या जगलेल्या क्षणाला लिहून माझ्या सोबत ठेवतोय ... २६ कमवलेले गुण घेऊन ज्यावेळी मी माझ्याकडे पाहिले  , त्यावेळी मला असे जाणवलं की प्रत्येक क्षणी हे गुण घेऊन मी चालत आहे . बघता क्षणी  आपोआप माझी चालण्याची पद्धत बदलली ,  छाती काही क्षणांसाठी फुगलेली जाणवली. असं वाटू लागले , हा क्षण मी माझ्या हृदयाच्या कप्यात साठवून ठेवावा. कारण,हा क्षण खूप जवळचा वाटू लागला...अनुभवांची शिदोरी जी माझ्याकडे आहे ती कधीही  न संपणारी आहे. तोच हा क्षण आहे जो सतत माझ्या मनात समाधानाची विशाल लाट निर्माण करतो. मनामध्ये साचलेले खाली पण निघून गेले , व त्यात समाधानाच धन वाढू लागले.
ह्या कार्यशाळेचं  वैशिष्ट्य म्हणजे सातत्याने अनुभव येतात व ते नवीन कलागुणांना जन्म देतात ...अश्यावेळी आपल्या सोबत असणाऱ्या या कलागुणांना सांभाळण्यासाठी काय काय करायला हवं , त्याची अलौकिक प्रक्रिया ह्या कार्यशाळेत झाली.
अगदी सकाळी उठल्यापासून ....ज्यावेळी आपण सकारात्मक मानसिकता घेऊन येतो त्यावेळी नक्की आपण कुठे असतो ? त्याचे सुंदर चित्र मंजुल भारद्वाज सरांनी दाखवले. सकाळी उठल्यानंतर सहभागी साथी ज्यावेळी नियोजित ठिकाणी यायचे ते कशा पद्धतीने यायचे ... हे डोळ्यासमोर दिसून येत होते. आदल्या दिवशी घेतलेले अनुभव ..ज्यावेळी आपण  रात्री झोपतो त्यावेळी त्या अनुभवानां सोबत घेऊन झोपतो कि, तो अनुभव विसरून जातो ? याच प्रात्यक्षिक हे सकाळी मिळाले ...सकाळी उठल्यानंतर आम्ही नियोजित ठिकाणी भेटण्याचे ठरले त्यावेळी , येणारा सहभागी हा ज्या मानसिक्तेमधून येत होता.. त्यानुसार त्याचे शरीर बोलत होते. कोण उत्साही होता. तर , कोणी आनंदित , कोणी शरिराचा ओझ घेऊन, कोणी आदल्या दिवशी जगलेल्या अनुभवाचं मनन , तर कोणी कधीही तयार आकाशात उंच उडण्यासाठी , नवीन विचारांच्या शोधात..
या एका प्रक्रियेवरून समजलं व्यक्तीच माइंड maping म्हणजे काय ? ... व्यक्ती कोणत्या भूमीवरून येत आहे.. आपल्या बरोबर संवाद करत आहे ते एका क्रियेटरने समझने गरजेच आहे... ह्याच बरोबर मंजुल सरांनी एक सूत्र हातात दिले ..".की हीच ती वेळ असते जेव्हा एका लीडर ने जबाबदारी घेऊन प्रक्रियेला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांना एकाच धरातल वर घेऊन येणे. " ह्या प्रक्रियेमुळे मला समजले व्यक्ती ज्यावेळी माझ्यासमोर येत आहे तो नक्की काय विचार करतोय ? तो नक्की कोणत्या ठिकाणी आहे .? त्याच्याबरोबर मी कशा पद्धतीने जोडला जाईलं याचे सूत्र मला मिळाले. कार्यशाळा संपल्यानंतरही आता मी व्यवहारिक जगामध्ये वावरत आहे त्यावेळी मला लगेच समजत आहे .. कि , ह्या व्यक्तीची नक्की मानसिकता काय आहे. ? आणि मला त्याच्याबरोबर काय बोलायचं आहे .. मला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी काय करायचं आहे  ....हे समझले आहे.
व्यक्ती समूहामध्ये सर्कल मध्ये बसून एक अजेंडा केंद्र स्थानी घेऊन ज्यावेळी काम करत असतो,  त्यावेळी त्याची ऊर्जा, समूहाची ऊर्जा केंद्रस्थानी येऊन ती परावर्तीत होत एकमेकांना प्रेरणा देत असते. समूहाच्या ऊर्जा ही एका  ध्येयाच्या द्र्ष्टीने काम करत असते. रात्री समूहामध्ये चर्चा करत असताना आम्ही एका ऊर्जेमध्ये एकत्र बसून , एक ध्येय ठेऊन काम करत होतोे. झोपायला गेलो . त्यावेळी स्ट्रक्चर हे बदललेले होते, आणि त्याचा थेट परिणाम असा  झाला कि आम्ही एक अजेंडा घेऊन करणार होतो ते काम झाले नाही. प्रत्येक जन त्याच्या व्यक्तिगत कामामध्ये गुंग होऊन गेला. प्रत्येक जन वेगवेगळ्या बेड वर असल्यामुळे जी समुहाची असणारी ऊर्जा विभागली गेली. त्याच बरोबर एक विषय केंद्रस्थानी ठेवून आम्ही जो विषय अजेंडा म्हणून घेणार होतो तो झालाच नाही. त्याच बरोबर एक गोष्ट लक्षात आली की , विषय केंद्रस्थानी असणं हा एक मुद्दा आहे . त्या विषयाला लीड करून पुढे घेऊन जाण्यासाठी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्याच बरोबर घेतलेली जबाबदारी पूर्ण करणे हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. स्ट्रक्चर नुसार झालेले विभाजन व्यक्ती ला स्वतः पर्यंत केंद्रित करतात . हे ही त्यावेळी समजले. मग, असं लक्षात आले की ,आपल्या भारतीय संस्कृती मध्ये समूहाला विशेष महत्व दिले जायचे. मग, समूहाने बसून चर्चा करणे ,एकत्र बसून जेवणे. घराची रचना ही त्याच प्रमाणे असायची . इंग्रज आले त्यांनी त्यांची व्यवस्था निर्माण करण्यासाठी वास्तू मध्ये विशेष बदल केले बसण्याच्या व्यवस्थे मध्ये बदल केले. जसं, उदाहरण म्हणून पाहिले की लक्षात येईल. आताची शिक्षण व्यवस्था ..समोर असणारा शिक्षक उभा राहून शिकवत असतो.बाकीचे रांगेत बसून ऐकत असतात. त्यांना समजत ही नाही शिकवणारा काय शिकवत आहे . एका बाजूला कळतही असेल. पण ,जो शिक्षक समजवत असतो त्याच्या मध्ये फक्त ordered देण्याचा भाव निर्माण झालेला असतो. अशा पद्धतीमध्ये रचनेमध्ये बदल करण्यात आले. ज्यामुळे व्यक्ती हा स्ट्रक्चर ने तुटला गेला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी महत्त्वाच्या गोष्टी.... थिएटर ऑफ रेलेवन्स च्या कार्यशाळेमुळे समजायला लागल्या. त्यामुळे समूह आणि उर्जेला कशापद्धतीने टिकवून ठेवता येईल हे समजले.

प्रत्येक व्यक्ती मध्ये अफलातून ऊर्जा असते. जीवनातील ध्येयाला साध्य करण्यासाठी त्याच्यासाठी योग्य नियोजन आणि ते ध्येय पूर्ण करण्याचा लागलेला ध्यास ...व्यक्तीला त्याच्या ध्येया पर्यंत घेऊन जाते. जीवनात जगताना ध्येय ठरवणे खूप महत्वाचे आहे. ते ध्येय नक्की काय आहे. हे हि समजून घेण म्हत्वाच आहे . ह्या कार्यशाळेत आमच्या बरोबर नवीन साथी होती. व्यक्तीची असणारी ध्येयासाठी तळमळ आणि काम करण्याची अफलातून जिद्द .. नवीन संकल्पना समजून घेणे .. असे विशेष गुण त्या व्यक्ती मध्ये दिसले. त्या व्यक्तीच्या ऊर्जेला नवीन ध्येय थियेटर ऑफ रेलेवंस ने मिळवून दिले. ब्रोड-वे ला जाण्याचे . त्यासाठी केलेला संकल्प . आपल्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने जाऊ शकतो याच नियोजन याचा आराखडा . एका व्यक्ती पासून असणारी सुरू होणारी जर्नी व  त्याची वैश्विक  व्यापकता ह्या गोष्टी एकत्र दिसू लागल्या . थियेटर ऑफ रेलेवन्स हे व्यक्तीला ध्येय देते . ज्यामुळे त्या व्यक्तीची त्याच्या अस्तित्वाची एक उंच आणि वेगळीच ओळख निर्माण होते .. ह्या विश्वव्यापी ध्येयामुळे एक सकारात्मक वैश्विक बदलाची चाहूल माझ्या मनाला त्या क्षणाला जाणवू लागली.

ह्या कार्यशाळेच अजून एक  वैशिष्ट्य म्हणजे ,  आपल्या बरोबर असणारा साथी , सहसंवादी ह्याला आपल्या कडून काय अपेक्षित आहे हे खूप महत्वाचे आहे. त्याच्या गरजेनुसार त्या व्यक्ती ला तेवढे देणे. त्याच्यापेक्षा जास्त दिल्याने जास्त ओवरडोस होऊन साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. ही महत्वपूर्ण  प्रक्रिया मला समझली.
वैज्ञानिक किती सतर्क असतो ज्यावेळी तो त्या वेगवेगळ्या रसायनांना एकत्र मिक्स करून नवीन पदार्थ बनवत असतो. त्याला हे माहिती असत मला हे काय बनवायचं आहे. त्याचे होणारे फायदे आणि तोटे याची जाणीव त्या व्यक्तीला माहिती असते. त्याच्यासाठी जो जाणीवपूर्वक एक – एक पदार्थ त्या मिश्रणा मध्ये टाकत असतो. त्याचं बरोबर येणारा result पाहण्यासाठी तो निरीक्षण करत असतो.मला ह्या कार्यशाळेत माझ्यातील संवेदनांची  जाणीव झाली कि , नक्की मी काय करतोय ...माझ्या बरोबर नेहमीच सुरु असलेली मानवी प्रयोगशाळा त्याची जबाबदारी नक्की मी घेतोय का ? ... नक्की मी जे वागतोय , करतोय त्या रसायनांचा होणारा प्रभाव नक्की काय आहे ... ह्याची एक उत्प्रेरकाच्या भूमिकेत जबाबदारी मी घेतोय का ? असे असंख्य प्रश्न त्या वेळी माझ्या मनात निर्माण झाले . व यातून मला हे जाणवलं कि, मला या  पुढे जगत असताना वागत असताना नक्की काय करायचं आहे व कसं जगायचं आहे ..
अशा निसर्गातील वेगवेगळ्या रंगछटा रंगवणारी हि कार्यशाळा ...ज्यामुळे जाणीव झाली , मला माझ्यातील ...निर्माण झालेल्या गुणांची ...जिथे जाणीव झाली मानवाच्या आत सुरु असणाऱ्या विचारांची ... जिथे मार्ग आहे  नवीन ओळख निर्माण करण्याचा ...जिथे संकलित होतात  माझ्यातील कलागुण ... माझ्या संवेदना ... नवीन परिघातील प्रवेश ... व्यक्तीच्या विचारांच्या समुद्रातील खोली ...त्याचं बरोबर उंच शिखरावरील उंच क्षण ... असे हे क्षण ज्या ठिकाणी करत असतो.. फक्त साधना ... साधना हि माझ्या व्यक्तित्वाला निर्मळ  करण्याची ... साधना हि माझ्यातील कलाकाराला ध्येयाने सार्थक काम करण्याची ... आपल्या विचारांच्या महासागरातून एक –एक मोत्यांचा कलागुण अर्जन करण्याची ....

थियेटर ऑफ रेलेवंस कार्यशाळा , युसुफ मेहरअली सेंटर , पनवेल
दिनांक २६ ते ३० जानेवारी २०१८

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday 6 February 2018

मी एक कलाकार आहे त्याच बरोबर भारताचा एक संवेदनशील नागरिक आहे. ....तुषार म्हस्के


आज ओळख देतो मला हा रस्ता ...चालताना आपलंसं वाटणारा...चालत असताना ... सुंदर वेगळीच ऊर्जा जी सतत या रस्त्यावरून चालताना मला जाणवतेय ... हवेची ताजगी माझ्या शरीरात संचार करते. त्यातच जाणीव मला माझ्या अस्तित्वाची होते. आज पर्वा कोणाची नाही . विश्वास वाढत चाललाय माझ्या विचारांवर....पदोपदी व्यवहारिक जीवन मला challenge करतोय. येणार आवाहन " मी " सहजतेने स्वीकारतोय ...विश्वास वाढत आहे स्वतः वर विचार करण्याचा आणि त्या विचारांना प्रत्यक्षात अनुभवण्याचा...  " थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली " काढण्याचा विचार मनात आला आणि तो विचार जनमानसात पोहचवण्यासाठी केलेला ध्यास..प्रत्यक्षात क्षणा - क्षणाला चिंतन प्रक्रिये मध्ये राहून हा विचार जनमानसात पोहचवण्यासाठी केलेले नियोजन अजूनही मनात प्रेरणात्मक वातावरण निर्माण करून जातोय...

मी एक कलाकार आहे त्याच बरोबर भारताचा एक संवेदनशील नागरिक आहे. सभ्यतेची संस्कृती शिकवणारा समाज आता विसरून गेलाय... तरुणांमध्ये देशाबद्दल भावना ,प्रेम  आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करायला. काही ठिकाणी तर देशाचे संवेदनशील नागरिक होण्याचे संस्कार दिले ही जात असतील त्यात वाद नाही.  परंतु, 1992 नंतरच्या पिढीबद्दल विचार करायला गेलो. की, संवेदना कुठेतरी कमी झाल्यासारखे दिसून येते.. कारण, ही पिढी ब्रँड वापरणारी पिढी त्यातच , देशाबद्दल संवेदना म्हणजे यांच्या साठी जुनी परंपरा ... ह्या अशा दूषित वातावरणात राजकीय मंडळी स्वतः च हित जोपासण्यात आपलं जीवन उपभोगत आहे. देशात विकासाने सर्वठिकाणी चिखल केले असताना...राजकारण आणि राजनीती बद्दल संवेदना संपत चालल्या आहेत.


देशाची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी देशाचं संविधान आणि न्याय व्यवस्था सुरळीत राहणे गरजेचं वाटू लागले आहे. त्यातच भारतातील नागरिकांचा  लोकशाही वरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. हेच लक्ष आहे सध्याच्या राजकारणाचं . भांडवलदार स्वतः चा फायदा करून  खरेदी आणि विक्री करून जनते जवळील धन लुटत आहेत . भांडवल दारांच्या प्रति सन्मान करणारं सरकार ..सामान्य जनतेच हाल करत आहे.. गरज आहे राजनीति बद्दल संवेदना निर्माण करण्याची...
" थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत " जनमानसात कलेच्या माध्यमातून परिवर्तन आणण्यासाठी कार्य करत आहे .



थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांचे जनक मंजुल भारद्वाज  यांनी राजनीति ला पाहण्याची सकारात्मक दृष्टी विश्वाला दिली. ही रचना राजनीति बद्दल सकारात्मक दृष्टी व्यक्ती च्या मनात निर्माण  करत आहे...

राजनीति बद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने जनमानसात आवाज पोहचवण्यासाठी ...मनात संकल्पना आली राजनैतिक चिंतन रैली च आयोजन करूयात... ह्या रैली च आयोजन करत असताना आपल्याकडे असणारे संसाधन आणि आपल्या  मित्र परिवाराचा सहयोग ...
संकल्पना वास्तवात आणण्यासाठीचा संघर्ष
नवीन संकल्पना , नवीन आवाहन घेऊन येत असते त्याच बरोबर आपली नवीन ओळख निर्माण करत असते. असाच हा वेगळा आणि माझी नवीन ओळख करणारा अनुभव मला आला. संकल्पना घेऊन मी माझ्या मित्र परिवारात फिरत असताना ... खूप साऱ्या नकारात्मकतेचा त्रास सहन करावा लागला.  हे कसं होणार, याच्यातून जीवाला धोका आहे. हिंसेच वातावरण सुरू असताना , हिंसा होण्याची शक्यता आहे.  त्यामध्ये काहीही होऊ शकते.. असं वाटू लागले होते. या सर्वांचे ऐकत बसलो तर बाळ जन्माला येण्यागोदरच गर्भ पडून जाईल. पण, मला ह्या संकल्पनेला जन्म द्यायचाच होता . मग, त्याच नियोजन सुरू झाले... एका बाजूला चोही बाजूने येणारी नकारात्मकता माझ्या मनात जिद्द निर्माण करणारी वाटू लागली...ह्या रैली मध्ये काय काय होऊ शकतो त्याची यादी तयार केली ...त्याच बरोबर नियोजन करायला सुरुवात केली.



रैली बोलल्यानंतर  संकल्पना अशी होते की, खूप सारी गर्दी आणि नारेबाजी ...एकीकडे सर्वांचा आक्रोश... ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या.. मग, मी थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली .. इथे मला भीड , गर्दी नको आहे. विचार करणारे लोक हवेत... त्यामुळे आता गर्दीचा मुद्दा माझ्या डोक्यातून निघून गेला. दुसऱ्या बाजूला आता आपल्या विचारसरणी मधली माणसे कशी जोडायची हा प्रश्न निर्माण होऊ लागला...संकल्पना मनात आल्या बरोबर ही संकल्पना share करायला सुरुवात केली.. माझ्या समोर  येणारा प्रत्येक व्यक्ती ही संकल्पना ऐकत होता आणि हे कसं होईल ह्या विचारात असायचा दुसऱ्या बाजूला भीती ही मनात त्यांच्या येऊन जायची त्यामुळे एकदा भेटलेला व्यक्ती पुन्हा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असे ... हीच ती टाळाटाळ माझी हिम्मत वाढवत असे... नाही ! आता तर मी करणारच ... कोण येऊ किंवा येऊ  नये ... ! मी एकटा ह्या रैली ची सुरुवात तर करणार ...


नियोजन बनवलं त्यामध्ये पोलीस परमिशन काढण्याची जबाबदारी एका मित्राला दिली ... काही अंशी तो समोर हो ! हो ... बोलत होता ... पण , त्याच्या आत मध्ये असणारा सभ्य  माणूस त्याला जबाबदारी पासून लांब करत होता ... ह्या रैली मध्ये काय झालं .. तर माझ्या घरातल्या व्यक्तींचं काय होईल ? ... मग, माझ्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला.. ज्यामुळे रैली मध्ये वाद होईल असं काहीही वक्तव्य करायचं नाही . त्यानुसार , नियोजन करायला सुरुवात केली .. मग, जग जाहीर केलं ... आम्ही कोणत्याही व्यक्ती ,राजकीय पक्ष , जात ,धर्म ,पंथ किंवा असं काही करणार नाही ज्यामुळे राजकीय वातावरण बिगडेल ... नारे देताना एकच नारा असेल " हम हैं !" आणि राजनीति ची व्याख्या जी शुद्ध आणि पवित्र आहे. तेच वाचन करत यायचं ...  त्यामुळे वाद होणार नाही याची स्पष्टता आली ...

पोलीस परमिशन काढल्यानंतर माझ्या मनात झालेलं परिवर्तन -


वेळ ठरवल्यानंतर त्या वेळेत काम होणं खूप महत्वाचं आहे . ते नाही झालं की माझ्या मनात चीड - चीड होते . पोलीस परमिशन काढण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आता काय करायचं  ह्याच्या अगोदर पोलीस परमिशन काढण्यासाठी मी कधी गेलो नव्हतो. मग, पोलीस परमिशन घेण्यासाठी आवश्यक लेटर मध्ये काय काय नमूद असणार ह्याची नोंद मी करून घेतली.. माझ्या नावाने लेटर हेड बनवून मी त्याच्यावर संकल्पना मांडली.  मुद्दे लिहून स्पष्ट शब्दात ते घेऊन पोलीस स्टेशन ला गेलो . लेटर पाहिल्या नंतर पोलिसांचे मिळालेले सहकार्य सकारात्मक ऊर्जा देऊन गेले.
नवीन - नवीन सामाजिक कार्य करणारे ग्रुप , संघटना यांना भेटी देण्यास सुरुवात झाली . नावाला गर्दी करायची नाही आहे हा उद्देश डोळ्यासमोर असल्यामुळे  भेटणाऱ्या व्यक्तीला संकल्पना किती पटत आहे. हे पाहून त्याच्या वैचारिक पातळीला सकारात्मक दृष्टी देत मी विचार करणारा एक - एक व्यक्ती शोधू लागलो.
                                          


Concept स्पष्ट झाली गल्लीचा आवाज दिल्ली पर्यंत मला पोहचवायचा आहे. त्यामुळे रैली निघाली की फेसबुक वर लाईव्ह करायचं आणि नवं चेतना ची तरंग ह्या समाजात सोडायची.

थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली चा परिवर्तनीय काळ - 21 जानेवारी 2018 .सकाळी 7:30 ते 9:00
नक आप्पा पाडा रिक्शा स्थानक ते मालाड रेल्वे स्थानक ..



20 जानेवारी 2018 पर्यंत हृदयात धाकधूक होत होती . राजकीय पहिली पाऊलवाट कशा पद्धतीने निर्माण होईल याच चिंतन सुरू झालं . सकाळी आरशासमोर उभा राहिलो..आरशात पाहून बोललो .." आता मला माझी ही राजकीय भूमिका जगायची आहे" .
सकारात्मक उर्जेनिशी घरातून निघालो. सकाळची येणारी मादक हवा मनाला स्पर्श करत होती..वातावरण तेजोमय झालेले...

अप्पा पाडा रिक्षा स्थानकापासून प्रस्तावना करून चिंतन रैली निघाली . सकारात्मक व्याख्येचे वाचन करत असताना वातारणात कुतुहल निर्माण झालेले . प्रत्येक सहभागी  आपल्या जबाबदारी ने ऊर्जेमध्ये सहभागी झालेले. माझी भूमिका एकाच वेळी चौफेरी होती. रैली च्या आत मध्ये लक्ष देणे , बाहेर रिस्पॉन्स पाहणे, व्याख्येच वाचन करणे.
                        
क्रांतिकारक पतीवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे दिसू लागले . रैली चा उद्देश साध्य झाला .. सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जाणवू लागले . राजनीति पवित्र आहे . मला त्याच्यात सहभाग घ्यायला हरकत  नाही . गर्दी काहीच करत नाही पण, व्यक्तीच्या आत निर्माण झालेला लीडर परिवर्तन स्वतः करतो . त्याचबरोबर समाजात करून घेतो ...
 


थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने मला दिलेली राजनीति ला पाहण्याची पवित्र दृष्टी त्यातून झालेलं परिवर्तन .. माझ्यातील व्यक्तीला ला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जात आहे. त्याचा मला अभिमान आहे..
रंगकर्मी
तुषार म्हस्के

Sunday 4 February 2018

शासनाने असा त्रास द्यायचा ... अशी व्यवस्था निर्माण करायची की त्याचा सामान्य माणसाला काही उपयोगच होणार नाही..तुषार म्हस्के


सकाळची धावपळ ट्रेन ...पकडण्याची तयारी ...प्लॅटफॉर्म वर असणारी गर्दी ...पब्लिक ब्रिज वरून पाहिलं तर मुंग्यांसारखी दिसणारी गर्दी आणि त्या गर्दी मध्ये श्वास घ्यायला ही जागा नाही ... धावत - पळत गर्दी मध्ये घुसायचं आणि ट्रेन पकडायची ...काय करणार ... सामान्य थकलेला माणूस ...हातात सत्ता असूनही ... कधीही सत्तेला प्रश्न विचारत नाहीत..."भोग आलिया भोगाशी भोगलेच पाहिजे " अशी असणारी मानसिकता ...
सकाळची वेळ गर्दी आणि त्या गर्दी मध्ये एकमेकांना धक्का बुक्की करत एकदाची ट्रेन पकडायची ...ट्रेन मध्ये उभं रहायला जागा मिळणे कठीण ... एकमेकांच्या पायावर पाय देत उभं राहणं ... बसायला मिळणे म्हणजे नशीबच बोलायचं ... चांगलं झालं तरी नशीब आणि नाही झालं तरी नशीब... त्यात सामान्य माणूस विसरून जातो ... इथे नशिबाचा संदर्भ असा काहीच नाही आहे ... हा प्रश्न व्यवस्थेचा आहे...शासनाचा आहे ... पण, बोलणार कोण ?हा पडलेला प्रश्न ...
आजचा प्रवास ह्याच गर्दीतून करत मी मालाड पासून दादर पर्यंत पोहोचलो... ट्रेन मध्ये उतरताना आजिबात कष्ट न घेता आपोआप मागे असणाऱ्या गर्दीने धक्का द्यायचा त्यानुसार एका झटक्यात ट्रेन मधून बाहेर पडायचो... 

ट्रेन मधून उतरल्यावर पाहिलं तर " बंद काचा चकमकीत लोकल ट्रेन .. सम्पूर्ण Air - Condition प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जायला निघालेली बोरिवलीच्या दिशेने...platform वर असणारी गर्दी तशीच...ब्रिज वरून पाहिलं तर श्वास घ्यायला जागा नाही ...ट्रेन प्लॅटफॉर्म वर येते आणि पाहतो तर काय ? ... दरवाजे आपोआप उघडतात.. ट्रेन मधून एकात दुसरा माणूस बाहेर पडतो ... पुन्हा ट्रेन चे दरवाजे बंद होतात ... एकही माणूस चढत नाही ... ट्रेन पुन्हा निघून जाते...त्या ठिकाणी असणारी गर्दी एक तीळ मात्र हालत नाही. विकास बघायचा तर हा बघा ...
शासनाने असा त्रास द्यायचा ... अशी व्यवस्था निर्माण करायची की त्याचा सामान्य माणसाला काही उपयोगच होणार नाही... एक मात्र उद्देश " विकास " फक्त जगाला दाखवणे .. मात्र व्यवहारात विकास आजिबात दिसत नाही...विकासाचा बट्ट्याबोळ झालेली अशीही व्यवस्था ...काय कामाची ...ज्याठिकाणी विकास करायचा आहे ते सोडून नको तिकडे पैसे लावणे ...सध्याची AC लोकल ची असणारी अवस्था म्हणजे सफेद हत्ती पोसण्यासारखे आहे ...तरीही विकास ...

अपेक्षा आहे सामान्य माणूस लिहिलेल्या गोष्टी समजून घेईल आणि आपली संविधानिक भुमीका व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची बजावेल...

रंगकर्मी
तुषार म्हस्के

Friday 2 February 2018

राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... अश्विनी नांदेडकर




कोण म्हणतं  पॉलिटिक्स साठी पैसाच लागतो ... तुषार माझ्या सहभागीने थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेद्वारे हे अनुभवले आणि दाखवले की राजनीतीमध्ये पुढाकार घेण्यासाठी पैसे नाही तुमची इच्छा आणि उद्देश्य स्पष्ट हवा . . "राजनीती शुद्ध आणि पवित्र असते " या मंजूल भारद्वाज यांच्या तत्वाला उद्देश्य ठरवून तुषार आणि स्वाती यांनी मालाड मध्ये राजनैतिक चिंतन रॅली काढली ... त्याच्या या मोहिमेला सुरवात होण्याअगोदर त्याने आम्हा थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कर्मीना share केले ... त्यावेळी सुरवातीला आश्चर्य वाटले ... कारण जो तुषार आमच्यासोबत परफॉर्म करताना चाचपडत होता ... एकेक शब्दासाठी दहादा ओरडा खात होता ... कोणतेही जबाबदारीचे काम त्याच्यावर टाकताना त्याचा नंबर शेवटी होता ... पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या फेस्टिवल पासून त्याची अफलातून growth जाणवायला लागली ... एकेका गोष्टीवर तत्वांवर त्याची पकड मजबूत व्हायला लागली ... आणि थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेला त्याने घट्ट पकडून ठेवले ... या आयुष्य देणाऱ्या प्रक्रियेला त्याने आयुष्यात प्रत्यक्ष उतरवायला सुरवात केली ... लिखाण , त्याचा कामातला चिवटपणा , आणि मंजूल सरांचे मार्गदर्शन यामुळे या हिऱ्याला पैलू पडायला सुरुवात झाली ... आपला प्रत्येक अनुभवाची नोंद लिखाणात ठेवली ... प्रत्येक काम पेंडिंग न ठेवता पूर्णत्वाला नेले ... आणि सर्वात मोठा पुढाकार म्हणजे राजनैतिक चिंतन रॅली ... फक्त दोन बॅनर ...सोबतीला सहभागी स्वाती ... ठरवले की मालाड स्टेशन पर्यंत रॅली काढायची आणि जनमानसांत राजनीतीचा खरा अर्थ पोहोचवायचा..
आपल्या मित्रांशी
, राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या माणसांशी बोलायला सुरुवात केली ...आपले ध्येय सांगायला सुरुवात केली ... आणि ध्येयाशी लोकांना जोडायला सुरवात केली ... आज राजकारणात असलेल्या काही स्वार्थीलोलुप व्यक्तींमुळे राजनीती ला अर्थहीन बनवणे सुरू झाले आहे .. सुविद्य सज्ञान लोक याकडे पाठ फिरवतात ...this is not my cup of tea म्हणत सरळ सरळ या ignore करतात आणि राजनीतीला एक जंजाळ बनवायला प्रवृत्त करतात ज्यात ते स्वतः कधी फसतात हे कळतही नाही ... म्हणूनच आता वेळ आली आहे की प्रत्येक नागरिकाने राजनीतीचा खरा अर्थ आणि तिची पवित्रता समजून घेणे ... कारण ही राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... पोलीस परमिशन पासून सगळे सोपस्कार करत त्याने आपल्या ध्येयाला पूर्णत्व दिले सकाळी 7.30 ला आपले बॅनर आणि सहभागीनना सोबत घेऊन राजनीतीची खरी व्याख्या वाचत ...




रंगकर्मी
अश्विनी नांदेडकर