Monday 30 January 2017

26 जानेवारी 2017 गणतंत्र दिवस माझ्या मध्ये चेतना निर्माण करणारा.....


एक जबरदस्त अनुभव कधीही स्वतःला एवढ्या विचारांच्या ताकदीमध्ये पाहिलेलं नव्हतं....आज पाहिलं आणि ऐकला माझा आवाज मी ....सृजनाच्या माउंट एवरेस्ट वरुन घेतलेली ऊर्जा आज या व्यवहारात उतरवली ... कलाकाराच्या ताकदीने , विचाराने ध्येयाला स्पष्ट केल्याने .....आज माझा performance हा विचारांचा आहे याची मला जाणीव झाली ....तू खुद्द को बदल ....तू खुद्द को बदल तभी तो जमाना बदलेगा ....दर्या कि कसम मौजो कि कसम ये ताना , बाना बदलेगा ....हा स्वता ला प्रश्न विचारणारा संवाद ....स्वतः पासून बदलाची सुरुवात करणारा प्रवास 



....अगदी सहज त्या 150 ते 160 मुलांबरोबर करणं....त्या मध्ये 18 ते 20 साधारणता मान्यवर .... विदर्भ एकता मंडळ संचालित विदर्भ विद्या मंदिर शाळा मालाड पूर्व .....या शाळेत मी 7 वी ते 10 वीत शिक्षण घेतलं....26 जानेवारी 2017 हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून ओळखला जातो ....संविधान हे भारतात 26 जानेवारी पासून रुजू झाले ....
आणि लोकशाही भारतात रुजू झाली ....संविधान आणि त्याचे तत्व हे पाहताना फक्त वाचनापूरते दिसू लागले व्यवहारीजीवनात त्याचा वापर दिसतो कि नाही हा प्रश्न आहे ....एका बाजूला राजेशाही संपली आहे ....तरीही , त्यांच्या नावावर राजकारण करून लोकप्रिय , समाजरचणीय राजाचा नाव घेऊन भोळी भाबडी जनता फक्त त्या ओघात फक्त शिवाजी जन्माला येईल आणि आम्हांला वाचवेल ...हि मानसिकता दूर करण्यासाठी संविधानातील तत्वांचा माझ्या व्यक्तिगत जीवनात किती फरक पडतो हे मांडणे महत्वाचे वाटू लागले...

.डोक्यामध्ये विचारांचा काहोर निर्माण झाला ....देशाचं भविष्य माझ्या समोर लहान ....किशोरवयीन त्या मुलां -मुलींमध्ये दिसत होते ....त्याच बरोबर भूतकाळ हा मान्यवर मंडळींच्या रूपाने मंचावर बसलेला दिसू लागला....एक विचारांची ज्योत या किशोर आणि किशोरींमध्ये पेटवायची हा विचार ....त्यामध्ये वयस्कर मंडळींना एक ऊर्जा देणं ....30 ते 40 मिनिटे झाली सर्व मंडळी भाषण देण्यात व्यस्त ....त्यामध्ये त्या मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षा भोगत आहोत असा भाव जाणवू लागला .....त्यामध्ये वक्ता काय बोलतोय आणि ते प्रेक्षकांना काय समजतोय हा प्रश्न निर्माण माझ्या मनात होऊ लागला ....संस्थेकडे 10 ते 15 मिनिटे हक्काने मागून घेतली मी बोलणार .....मनात पहिलाच विचार आला ....यांच्य मध्ये ऊर्जा निर्माण करायची ....दुसरा प्रश्न आला ....आता काय बोलायचं ? संविधानाविषयी बोलताना तथाकथित माहिती सांगायची कि , ते संविधानाचे तत्व जगायला लावायचे ....त्या तत्वांची ताकद दाखवून द्यायची .....मग, एका मागून एक तत्व , विचार काय बोलणार ? काय करणार ? याची रचना माझ्या डोक्यात निर्मान झाली ....मग, उर्जेने भरलेल्या या महासागरात मी उडी मारली .....आणि त्या वातावरणाला बदलायला सुरुवात केली ...पहिला पाऊल टाकलं आणि त्याच बरोबर त्या लहान मुलांनी त्याला साद दिली ....ऊर्जेचा स्रोत म्हणजे लहान मुले


....त्यांना शब्द दिला.... हैं .... त्याच बरोबर ती लहान मुले बोलली आम्हांला हा शब्द माहिती आहे ....मनात झालं अरे , वाह ....छोट्या छोट्या गोष्टी कशा लक्षात ठेवतात हि मुले ....मग , मी शब्द हम घेतला ....आणि त्या वातावरणाला आवाज दिला ....त्याच बरोबर त्या लहान मुलांचा आवाज हा सर्वात जास्त येऊ लागला ....मग, मान्यवर मंडळींना आवाज दिला ...त्यांचा हि आवाज येऊ लागला ....असा त्या संपूर्ण शाळेच्या वातारणामध्ये " हम हैं " गुंजायमान झाला ....त्याचं बरोबर प्रश्न केला ....हि जागा कोणाची आहे ....? मग , त्यांचा उत्तर आला आमची ....मग, त्यांना सांगितले बोला ....हि जागा माझी आहे .....हे जीवन माझं आहे.....विचार करणे माझा अधिकार आहे ....निर्णय घेणे माझा अधिकार आहे .....हे बोलत असताना मुलांची बॉडी langauage बदलली ....आणि ऊर्जा त्यांच्या नसा नसांमधून वाहू लागली ....त्याच बरोबर शिक्षक वर्ग अभिमानाने माझ्याकडे पाहताना दिसू लागला त्यांच्या मनात अभिमानाने छाती फुगून यावी अशी त्यांची प्रतिमा डोळ्यांना दिसू लागली....शेवटी या उर्जेमध्ये उडी मारताना ....जबदस्त ताकद आणि ऊर्जा मला पुन्हा पुन्हा मिळाली ....ती परावर्तित होऊन माझ्याकडे येऊ लागली ....मंजुळ भारदवाज यांच्या थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्य सिद्धांताने दिलेल्या तत्वाने ....दिलेल्या सांविधानीक दृष्टीने आज हा सरळ विचार मांडता आला ...असा हा 26 जानेवारी 2017 ला गणतंत्र दिवस माझ्या मध्ये चेतना निर्माण करणारा , माझ्या समाजात चेतना निर्माण करणारा ....जाणवू लागला


रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Wednesday 18 January 2017

चैतन्याच् चैतन्य हे विचारांत असतो ..

चैतन्याच् चैतन्य हे विचारांत असतो ....अणि अशीच एक यात्रा जी वेगळी आहे ....जी सकाळी सूर्य उगवण्याआधी सुरु होते ....योगा ....अनहद नाद चा योगा बरोबर काय संबंध आहे ....?.... आपल्या राष्ट्राची विरासत म्हणजे अध्यात्म ....अनहद नाद ची यात्रा ही माणसाला त्याच्या स्वताच्या अंतरंगासोबत जोड़ते ....आणि हा अनुभव 4 जानेवारी 2017 मलाड पूर्व ....या ठिकाणी आला ...सकाळी आम्ही कलाकार योगा 



करणाऱ्या वर्गाला भेटलो ...tor टीम ची ओळख ...अगदी सहज आणि 
साध्या शब्द प्रणाली मध्ये करून दिली ...त्यातच शब्दांमध्ये येत असणारी लचक व पहिल्यांदाच बोलताना मी माझे शब्द ऐकत आहे ही जाणीव ...माझ्यासाठी मला आत्मीक समाधान मिळवून देणारी आहे ...आंतरराष्ट्रीय कलाकार सायली पावसकर यांनी योग करणाऱ्या साथीना व्यवस्था बदलण्याचे आवाहन केले त्यामध्ये त्यांच्या बरोबर संवाद साधत अगदी सहज रित्या त्या साथींनी गोल सर्कल केला ...आपले बसण्याचे आसन घेऊन वर्तुळात बसले ....त्यानंतर 



राष्ट्रीय tor कलाकार कोमल खामकर ....यांनी मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक " अनहद नाद - unheard sounds of universe "मधील शेवटचा गाणं ऐकवलं ...डोळे बंद करून एकदम स्वतःला स्वताशी संघर्ष करून त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवला ....त्यांच्यासाठी डोळे बंद करणे हेच एक मोठं आव्हान होते...आणि अपनी अनसुनी आवाज सूनो ....बरोबर एका वेगळ्या विश्वात त्यांना तो सूर घेऊन गेल्याचा अनुभव त्यांनी सांगितला ....स्वताचा आवाज जो आतापर्यंत दाबून ठेवला आहे तो आवाज मला ऐकायचा आहे ....माझं एक वेगळं अस्तित्व आहे ...याची जाणीव झाली ...या प्रकारे त्यांचा प्रतिसाद आम्हाला समृद्ध करत होता ....मी आणि माझी सखी ...दोघेही या प्रक्रिये बरोबर " बाबा साळवी "


 मैदानात एकरूप झालेलो ....या प्रक्रियेनंतर एक सुर छेडला ....तारा रा रा ...तारा रा रा रा ....ता रा रा रा ...ता रा रा रा ..ता रा रा रा रा....आणि त्याच सर्कल मध्ये निरागस अशा लहान बाळाच्या भूमिकेत सर्व सोबती ....गोल गोल फिरू लागले ....पायांची गम्मत अशी होती की लेफ्ट राईट ....लेफ्ट ...परेड गाण्याच्या सुरु होता ....एवढं निरागसतेने लहान जिज्ञासू मुलां / मुलीं बरोबरोबर ...प्रवास सुरू होता ...म्हणजे जास्तीत जास्त वयोगट 60 



असणारे साथी आता 6 वर्षाचे वाटू लागले ...मंजुळ भारद्वाज ....आपल्या कुटीमधून हा सूर ...संपूर्ण ब्रम्हांडात सोडत आहेत ...आणि तो सुर तो आवाज मला त्यावेळी डोळे बंद केल्यावर मिळाला ....या अनह्द नाद च्या तेजोमय नादात संपूर्ण मैदानात चैतन्य निर्माण झालेले आणि त्या चैतन्याचा सूर घेऊन ...एक मैत्रिचं नातं घेऊन आम्ही पुन्हा परतीचा प्रवास केला....


रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Wednesday 11 January 2017

मी शोधतोय माझ्या समाजात “ सावित्री "......

मी शोधतोय माझ्या समाजात “ सावित्री “... मंजुळ भारद्वाज यांच्या नाटकामधील हा संवाद आणि हाच संवाद आहे जो सावित्रीबाई फुले यांचे विचार जिवंत ठेवतो ....आणि त्या सावित्रीची दृष्टि समाजात शोधतो ....मना मध्ये ध्येय  आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी केलेला प्रण म्हणजे आपली साधना ही साधना चेहऱ्या वर तेज वाढवते .....

तुषार, या कार्यक्रमानंतर तू एकदम चमकत आहेस ...ती शांतता तुझ्या चेहऱ्या वर दिसत आहे .....असं माझी सखी मला बोलली ...त्याच बरोबर मी तिच्याकडे पाहिलं ...तिच्या चशम्यामधून तिचे डोळे चमकताना जाणवले ...आणि तिचे शब्द आठवले ..... I am proud that...I am girl …. “ मैं औरत हूँ ” ...याच्यापेक्षा मोठं समाधान काय असणार ? ....म्हणजे केलेले कार्य संपन्न झाल्यासारख वाटले ....त्याच रस्त्याने चालत मी घरी आलो ...आणि घरामध्ये पाहिलं ..तर वातावरण प्रसन्न वाटलं रात्रीच जेवून झोपायला गेलो ....त्याच बरोबर १० दिवसाची यात्रा डोळ्यासमोर आली ....एक – एक  चित्र डोळ्यासमोर उभे राहू लागले ....काय झालं ? कसं झालं ? ....हि यात्रा डोळ्यासमोर उभी राहिली .... राजनैतिक अजेंडा घेऊन मी राजकारणी लोकांना भेटायला सुरुवात केली ....व्यक्तीचं समजामध्ये असणार रूप ....त्याची समाजात असणारी ओळख ...आणि त्याच्याबरोबर मी त्याला ओळखतो असा दृष्टिकोन ...त्यामध्ये त्याची असणारी प्रतिमा ... एका बाजूला काही नेते हे भांडवल दारांचे गुलाम झालेले ...दुसऱ्या बाजूला बिल्डरांनी त्यांना विकत घेतलय ....आणि ते नेते आपल्या विभागात काम न करता उगाचचं मोठ मोठ्या गुंड् मंडळींचा वापर करून घाबरवण्याची कामे करत त्यांच्या समोर जायचं ...कि , नोटबंदीच्या नावाखाली सामान्य लोकांचे हाल करून भांडवलदारांना मोकाट सोडणाऱ्या ...पक्षाकडे जायचं ....कि , जे नेते आपल्या खिशातून पैसे टाकून लोकांच्या समस्या सोडवणार्यांकडे जायचं ....असा प्रश्न मला पडला ...त्यावर माझ्या मनामध्ये एक आशेची किरण जागी झाली ...ती म्हणजे समस्या सोडवणाऱ्या लोकांकडे जाण्यास सुरुवात केली ...जाऊन भेटलो ...स्वताची ओळख करून दिली...माझी फाईल दाखवली ...आणि राजनैतिक चर्चा सुरु केली ... प्रश्नांना उत्तर आणि नवीन प्रश्न ....त्यातून होणारी चर्चा याने माझी एक तटस्थ राजनैतिकाराची भूमिका थियेटर ओफ रेलेवंस नाट्य सिद्धांतामध्ये तयार झालेली जाणवली ...त्यामध्ये बदल जाणवला तो म्हणजे ...व्यक्तीकेंद्रित राजसत्तेला विरोध त्याच बरोबर ...संविधानिक सत्ता सुरु ठेवण्याचे सूत्र शोधणारी माझी मानसिकता ....या गोष्टी बोलताना मी कलाकार असल्याची सामाजिक जाणीव .... त्याच बरोबर, हे जाणवू लागले आपल्याला समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्या आई ला म्हणजेच ...महिलांना सक्षम करणे त्यांच्या मनात असणाऱ्या पितृसत्तात्मक विचारांना थांबवणे ...बरं , आता हि मोहीम कशी सुरु करणार .... मंजुळ भारद्वाज लिखित नाटक “ मैं औरत हूँ ” या नाटकाचा प्रयोग आपण   कुरार मध्ये ठेवणार ...त्याच्यामागची भूमिका स्पष्ट होती ...कोणी बघायला आलं तर उत्तमच आहे आणि नाही आलं तर माझी मम्मी हे नाटक बघणार  हे ठरलं|

                            

 ....आता ,  राजकारणी लोकांना भेटण्याची मोहीम सुरु केली ...त्यांना सांगितलं ३ जानेवारी २०१७ ला कार्यक्रम ठेवायचं आहे त्या मध्ये आमचे अंतरराष्ट्रीय कलाकार येणार आणि नाटक सादर करणार त्याच्यासाठी तुम्ही काय करणार ? ....मुळात, ७ दिवस बाकी होते ३ जानेवारीला आता पहिला म्हणजे हे ऐकूनच सर्वांची बोलती बंद झालेली कि , हे नाटक बघायला कोण येणार ? ...हे असं वैचारिक नाटक चालत का ? या सर्व मनाच्या आत मधल्या गोष्टी होत्या ...हा कार्यक्रम फ्लोप होईल ... त्यामुळे समाजामध्ये negativity पसरेल ..... मी शांत ऐकत होतो ....थोड्या वेळात सर्व ऐकून घेतलं आणि मी बोललो ...तुषार म्हस्के कार्यक्रम लावणार तुम्ही येणार कि नाही ....या ठिकाणच्या महिला येणार कि नाही ? ...थोडं हवेतील उत्तरे मिळाली .... आता नवीन संकल्पना
मांडत असताना ...मला माहिती होत कि हि कशा पद्धतीने सादर करायची आणि त्याच्यासाठी मला काय करायचं आहे ? ....आणि खरोखरच ती एक जिद्द मनात निर्माण झाली कि आता मी काहीही करून प्रयोग हाऊसफूल करणार ...? ....लगेच , कामाला सुरुवात केली ....ताबडतोब चर्चा करण्यास सुरुवात केली आणि ...मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बोलू लागलो ...३ तारखेला मालाड मध्ये “ मैं औरत हूँ ” चा प्रयोग आहे क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले दिना निमित्त ...तुमच्या आजूबाजूला सर्व महिलांना सांगा ....माझ्या विचारांप्रमाणे डोळ्यासमोर असणारी परिस्थिती बदलू लागली .....त्याच्या मध्ये एक सूत्र हातात घेतले ... आपल्याला प्रत्येक दिवशी मंजुळ सरांबरोबर बोलायचं आहे त्याच बरोबर टिम बरोबर संवाद करायचा आहे त्यासाठी प्रत्येक दिवशी यांच्या संपर्कामध्ये राहिलो ... मग, निमित्त साधून सरांना फोन करणे ...त्यांना फोन वर अपडेट करणे ...त्याच बरोबर टिम बरोबर बोलणे यामुळे एक उर्जा निर्माण होण्यास सुरुवात झाली ... आणि एक खास गोष्ट जाणवली ती म्हणजे ...थोडाही निराश झाल्यावर मंजुळ सरांना फोन करणे ...फोन लावण्या अगोदरच एक सकारात्मक ऊर्जा माझ्या जवळ येत असताना जाणवायची ... माझ्या समोर कामे एका मागून एक अशी रांगेत उभी होती ....त्यांना संपवत - संपवत पुढे जायचं ... हे सूत्र माझ्या आत मध्ये आग लावत नवीन विचारांना जन्म देऊ लागले ....एका event म्हणजे आता पर्यंत फक्त त्रासच अंगावर ओढावून घेतला होता .....हा event करत असताना अजिबात त्रास नव्हता ..... या होणाऱ्या वैचारिक क्रांती बद्दल मी बाहेर बोलायला सुरुवात केली ...त्याच बरोबर आमच्या शाळेच्या सेक्रेटरी यांनी याला प्रतिसाद दिला कार्यक्रम निश्चित झाला ...एक पाउल पुढे टाकत मी घेतलेला निर्णय पूर्ण करण्याची हि वेळ माझी आहे हे जाणवू लागले ...सावित्री बाई फुले दिनानिमित्त हे सादरीकरण करण्याचे ठरले ...वेळ सायंकाळी ५ वाजता ची ठरली .... थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य
सिद्धांतामध्ये प्रेक्षक हाच मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे ....त्यानुसार मी या कार्यक्रमासाठी माझ्या मम्मी पासून चाळीतील महिलांना सांगायला सुरुवात केली ...त्यामध्ये बचत गट ज्यांचे आहेत अशा महिला ....त्यानंतर जो व्यक्ती भेटेल त्याला या कार्यक्रमाबद्दल सांगाणे ...प्रत्येक क्षणाला त्याची चर्चा करणे ....आणि ज्या ठिकाणी राजकीय चर्चा होतील अश्या ठिकाणी ....४ ते ५ चाळींमध्ये मित्रांच्या घरातल्यांना या कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि एक वातावरण , एका वातावरणाची निर्मिती करत याचा प्रचार आणि प्रसार करत होतो .. कार्यक्रम शाळेत

असल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून विचारणा केली ... त्यावेळी जाणवले त्यांनी या कर्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगायला सांगितले ...दुसऱ्या banner २  लावले , पोस्टर चे २५  ते ३० प्रिंट आउट चाळींमध्ये मित्रांना लावायला प्रेरित केले .... हे एक टिम वर्क आहे ...आणि माझ्या अंगा मध्ये एक टिम कार्य करत आहे हे जाणवू लागले ....आणि एक जाणीव या मध्ये सतत दिसली ...ज्याला सद्सद विवेक बुद्धी दिसली ती म्हणजे हा कार्यक्रम माझा आहे आणि याचे आयोजन मला करायचा आहे ... आणि कोणासाठी नाही माझ्या  मम्मी साठी हा प्रोग्राम करायचा आहे ... त्यामुळे कोण या कार्यक्रमाला येईल याची चिंता मनात आलीच नव्हती ... हि तयारी सुरु असताना एका मागून एक संसाधने निर्माण होऊ लागली ..मी फक्त निसर्गामध्ये आता मला काय हवय त्याचा विचार केला तर , आपोआप माझ्यासमोर त्या गोष्टी येऊन उभ्या राहत होत्या .... त्यामुळे त्याचं एक समाधान मला मिळू लागले ....

३ जानेवारी २०१७ , सकाळी ५ वाजता मी आणि माझी सखी आम्ही दोघे चैतन्य अभ्यास करण्यासाठी निघालो कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल


तिच्याबरोबर चर्चा केली... माझ्या घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल तिची नेहमीच प्रेरणा दायी सहमती मला मिळते   ... दिवसभरात काम काय करायचं आहे ?  याची आखणी केली ....विचारांच्या वेगात ....माझा स्पीड मी वाढवला ...लगेच शाळेत जावून काय सुरु आहे काय त्याची आखणी आहे ....किती माणसे बसतील कसे बसतील ? त्यामध्ये प्रेक्षक जास्त झाल्यावर काय करता येईल ? याचे प्रतिबद्ध नियम बनवले ...जाऊन स्वताहून पाहणी केली ....नाटक गांभीर्य त्याचं बरोबर कलाकार कोण आहेत त्यांची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली ....आणि मनामध्ये एक माझ्या कालाकारांबद्द्ल एक स्थान आहे त्या पद्धतीने त्या वातावरणामध्ये त्यांची या वर्षांमधील साधना प्रसार केली ...मग ,ड्रोप बाय ड्रोप वाटर ,छेड छ्याड का ? ...अनहद नाद ,गर्भ ...त्यामध्ये माझे कलाकार आहेत ...त्यामुळे त्यांचा आदर आणि त्यांची ओळख यांच्याकडे मी प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले ....माझ्या छोट्या भावाला कलाकारांना घेऊन येण्यासाठी पाठवले त्यांना काय हवय नकोय ? याची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडे .....कार्य क्रमाची जबाबदारी माझी ....घरामध्ये कलाकार आल्यानंतर त्यांना काय हवय नकोय त्याची जबाबदारी माझ्या घरातल्यांनी घेतली ....कार्यक्रमाच्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व वस्तूंची , आणि आयोजनाची जबाबदारी शिक्षक आणि शाळेचे सेक्रेटरी घेऊ लागले .....एक गोष्ट जाणवली पितृसत्तात्मक समाजामध्ये महिला शिक्षक वर्ग या कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसला ....कारण, हा महिलांचा कार्यक्रम आहे ... आणि हिच समाजव्यवस्था आहे ...ज्या ठिकाणी महिला आणि पुरुष एकात्मतेची विचार धारणा करत असताना आपण किती त्यांना सहकार्य करतोय ...? हा हि एक प्रश्नच आहे .....कार्यक्रमाच आयोजन सुरु असताना तयारी सुरु होतीच ...बरोबर वेळ धावू लागली ...५ ते ५.१५ ला कार्यक्रम सुरु होण्याची वेळ घरातून कलाकार निघाले ....४.५५ पर्यंत फक्त ५ ते ७ महिला hall मध्ये बसल्या होत्या ...हृदयाचे ठोके ...वाढू लागले ...कोण येणार कि नाही हा प्रश्न ? त्याच बरोबर स्वताला सावरले ...हा कार्यक्रम कोणासाठी नाही आहे... हा माझ्या आईसाठी मग, काहीच टेन्शन नाही ...एक दम शांत मुद्रेत hall बाहेर जाऊन उभा राहिलो आणि येणाऱ्या प्रेक्षकांना ..नमस्ते , नमस्ते ..नमस्ते करायला सुरुवात केली ...मग, शाळेत शिकणारा मुलगा पाल्य असेल ...महिला असतील आणि वयस्कर महिला असतील ....आणि हे स्वागत करणे ...शिक्षक आणि त्या प्रेक्षकांना नवीन ताजगी देत होत ....एक सुंदर वातवरण निर्मिती त्यातून होऊ लागली ....कलाकार आले ...आणि मी आयोजनामध्ये थोडा दंगच राहिलो .
कलाकारांच स्वागत केलं ...मग , प्रेक्षक कोण आहेत यांच्या बद्दल सांगितलं ....त्याचं बरोबर मी शाळेच्या पटांगनामध्ये पाहिलं तर ताजगी फिरत होती ....त्याचं बरोबर प्रेक्षक आत मधून येण्यास सुरुवात झाली होती ... म्हणजे इकडे मी पाहत होतो ...आमचे कालाकार आले त्याचं बरोबर प्रेक्षक हि येऊन बसले होते १०० प्रेक्षक बसणार त्या ठिकाणी जवळ ..जवळ ३५० महिला प्रेक्षक बसल्या होत्या ...वाह ..क्या
बात ....है ? ...लहान विद्यार्थी ...त्याच बरोबर त्याचे पालक ....दूसऱ्या बाजूला महिला ...असं ...संपूर्ण सभागृह भरलं .. “ मैं औरत हूँ ” मंजुल भारद्वाज लिखित नाटकाची सुरुवात झाली आवाज करत असणारी मुले शांत झाली ....महिला शांत झाल्या ...अचानक वातावरनामध्ये शांतता पसरली कलाकारांनी वेळेला हातात पकडून ठेवलय हे जाणवू लागले मी शांत पणे जाऊन सर्वात मागे उभा राहिलो ...
८० % महिला हुंदके देऊन रडताना पाहिल्या ..डोळे पाणावलेले तरीही घट्ट मुठी आवळून ते सादरीकरण पाहत होत्या ...टाळ्यांचा आवाज त्या विदर्भ विद्या मंदीर शाळेच्या आवारात गुंजू लागला ....अश्रूंनी गहिवरलेल्या महिला जाणवू लागल्या स्वताला त्या मंचावर पाहत आहेत ...स्वतःची कहाणी ऐकत आहेत ....२० मिनिटे स्वतःचा शोध सुरु झाला .....नाटक संपल्यावर त्या गहिवरलेल्या डोळ्यांना पाहून मनाला वाटले तुषार सार्थक झाले ...कार्यक्रम त्याचे आयोजन आणि त्याची दखल तुला मिळाली ...आम्ही शोधतोय सावित्री


..माझ्या मध्ये असणारी ...आणि मी शोधतोय हि सावित्री जी समजामध्ये आहे ती माझ्या डोळ्यासमोर असणारी ....या कार्यक्रमाला आलेल्या राजनेत्या आमदार , माजी नगरसेवक ..एकदम गहिवरून गेल्या होत्या ....न बोलणारया महिला आज बोलू लागल्या ..या नाटकामधून प्रेरणा मिळाली ...हे माझ्या डोळ्यांना दिसू लागले होते ...या कलाकृतीच सादरीकरण ....अंतरराष्ट्रीय कलाकार अश्विनी नांदेडकर आणि सायली पावसकर राष्ट्रीय कलाकार कोमल खामकर ....यांनी केलं ...



थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला उन्मुक्त केलं ...एका बाजूला महिलांनचा आदर कधी मी केला नव्हता ..आणि आता तीन वर्ष थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला हि दृष्टि दिली कि मी महिलांचा आदर करतोय ..आणि त्यांच्या पितृसत्तात्मक विचारांपासूनच्या मुक्ती साठी मी कार्य करतोय ... आणि हाच माझ्या असण्याचा अर्थ मला या प्रयोगाच्या आयोजनातून जाणवला ......
--------------------------------
थियेटर ऑफ रेलेवंस रंगकर्मी – तुषार राजेश्री तानाजी म्हस्के

Monday 9 January 2017

28 January Performance of multilingual play by renowned Theatre thinker Manjul Bhardwaj "अनहद नाद - Unheard sounds of Universe"








On 28 Janury,2017 (Saturday) 11 AM
Shivaji Mandir, Dadar (West), Mumbai

Art is an exploration…. ever evolving process of fine tuning the nuances of creativity to facilitate the life to be alive to make mankind as humane… ever evolving artistic process purifies human to find their purpose of life, to encourage and strengthen their belief in “Humane & Humanity” …
Artist is a creator &  commits entire creativity to art, to carves into an ever evolving & free flowing spirit of positivism…. dedicates this vision of ‘Emancipative Artistic Positivism” to the world and inspire the world to commit their energy to create a world which is  ‘better & Humane’….

Artist do not live to fill up their bellies but to make the life artistic, to connect the human life with nature, to create harmonious rhythm between mankind & nature… as the mankind disconnects itself from nature … it becomes self disruptive & suicidal ..Man destroys mankind … and today in the name of “development” .... Man is at its peak to destroy the nature & mankind …. Today everywhere is war, violence & exploitation … nature is crying for peace…Love & harmony… the market and consumerism has overpowered the art & artists and made them puppets…. robots to propagate the neo global policies of Globalization .. which are a direct threat to nature, it`s biodiversity and pluralism … converted mankind into a “buying & selling commodity” for profit, consumption & exploitation!

In this challenging time and nature`s cry one way is to be silent and doing nothing, only waiting for a miracle… instead of doing nothing …we the performers of “theatre of relevance” chose to perform "अनहद नाद - Unheard sounds of Universe"... Premiered on 29 May 2015 in Ravindra Natya Mandir in Mumbai to liberate art & artists from productization.. .. Since then the dedicated “TOR” performers are enlightening the artistic fraternity & audiences through their emancipate performances…   
   
The play “अनहद नाद - Unheard sounds of Universe” is an exploration of artistic needs to emancipate art and artists from productization to commit their artistic creativity to make the world better and humane and not a profit and loss balance sheet of life. This formless play is conceived, designed, written & directed by internationally known theatre thinker and philosopher Manjul Bhardwaj.
Manjul Bhardwaj is a theatre person who responds to national challenges and sets national agenda through his philosophy "Theatre of relevance".   

The artistic fraternity & audiences gave an overwhelming response to this artistic emancipative celebration… We invite you to experience this wonderful performance on 28 January, 2017 at 11 AM in Shivaji Mandir ,Dadar (w) Mumbai.


The dedicated & committed “TOR” performers Ashwini Nandedkar, Sayali Pawaskar,Komal Khamkar & Tushar Mhaske made possible to actualize this gigantic dream !

Refrence

Sunday 8 January 2017

“अनहद नाद का मंचन” 28 जनवरी ,2017 (शनिवार) को सुबह 11 बजे मुंबई में !


कला एक खोज है … निरंतर खोज ..जो कहीं रूकती नहीं है ..बस जीवन को लगातार जीवन और मनुष्यों को मनुष्य बनाने के लिए प्रतिबद्ध होती है उनको लगातार शुद्दिकरण की प्रक्रिया के अनुभव लोक की अनुभति से जीवन और मनुष्य के उद्देश्य को स्पष्ट करते हुए… इंसान और इंसानियत का बोध और निर्माण करते हुए… कलाकार साधक हैं ..जो अपनी कला साधना से तपाता है अपने आप को और एक खोजी रूह की अनंत खोज में स्वयं समर्पित कर विश्व को अपनी कला से रचनात्मक दृष्टि देकर प्रेरित करतें हैं …

कलाकार मात्र अपना पेट भरने के लिए कलाकार नहीं होता अपितु मानव के जीवन को कलात्मक और प्रकृति की लय और ताल से जोड़ते हैं ..क्योंकि ये प्राकृतिक लय और ताल जब टूटते हैं तो मनुष्य विध्वंसक होकर अपने आप को नष्ट करता है … आज मनुष्य अपने इसी विध्वंसक रूप के चरम पर बैठा है और अपनी चालाकी से उसे विकास कह रहा है …जबकि चारों और हिंसा और हाहाकार है ..
कला और कलाकारों को बाज़ार ने अपने चुंगल में जकड़ कर कठपुतली बना लिया है ..और उन्हें मात्र एक
बिकाऊ वस्तु के रूप में जनमानस में परोस रहा है टाइम पास और उपभोग के लिए … ऐसे चुनौतीपूर्ण काल में अफ़सोस कर …बैठने की बजाय हमने कला एक वस्तु ..उत्पाद नहीं है और कलाकार कोई उत्पाद का कारखाना नहीं है .. कला और कलाकार की उन्मुक्तता पर नाटक लिखा “अनहद नाद – Unheard sounds of Universe”… जिसका २९ मई २०१५ को मुंबई के रविन्द्र नाट्य मंदिर में प्रथम मंचन से दर्शकों को लोकार्पित किया और तब से अब तक इसका प्रदर्शन निरंतर हो रहा है और दर्शकों का प्रेम और प्रगाड़ हो रहा है …

इस कलात्मक मंचन में आप सब सादर आमंत्रित है 28 जनवरी ,2017 (शनिवार) को सुबह 11 बजे मुंबई के शिवाजी मंदिर नाट्य मंदिर में….

इस सफलता को अर्जित करने वाले कलासाधक हैं … अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर,तुषार म्हस्के, और कोमल खामकर ..इन कलासाधकों ने अपने अथक और कलात्मक साधना से इस दिव्य स्वप्न को साकार किया है …


एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन विगत २५ वर्षों से देश विदेश में अपनी प्रोयोगात्मक , सार्थक और प्रतिबद्ध प्रस्तुतियों के लिए विख्यात है . सम्पर्क – 09820391859,ईमेल – etftor@gmail.com


Manjul Bhardwaj
Founder – The Experimental Theatre Foundation www.etfindia.org
www.mbtor.blogspot.com


reference
hindimedia.in

Thursday 5 January 2017

क्या यादें हैं वो ... तुषार म्हस्के

क्या यादें हैं वो ...
जो रंग की राह पर चलीं ..
अपने आप को खोजकर तराशते हुए 
अपने ध्येय की ओर चलीं  ....

ना कोई थकान , ना कोई लालच 
बस अपने आपको खोजने हम चलें 
पल में हँसते , पल में रोते ..
हम एक दुसरे का हात थाम कर निकल पड़े ....

ना भूक , ना प्यास .... 
बस लक्ष अपने आप पर विजय प्राप्त करना ...
धूल , मिट्टी , सूरज की आग में तपते हुए हम चलें  ...
रंगकर्म करने.... दुनिया को दृष्टि देने ...
हम अपनी राह पर चलें  ....

इस मायानगरी से परे ...
अनजान भयावह जंगल में ...
अंधेरी रात में ...हम चमकते हुए जुगनुओं को ढूंढने 
उस ज्ञान के पेड़ की ओर चलें ....

सुकून भरे पल को 
अपनी अनसुनी आवाज को सुनने हम चलें...
निती को अपनाते हुए ...विचारोंकी स्पष्टता को साधते हुए ....
हम  ' रंगसाधना  ' करने चलें .....

-----------------------------------------------------------
थियेटर ऑफ रेलेवंस रंगकर्मी
- तुषार म्हस्के