Friday 16 December 2016

या विश्वाच्या रनभूमिवर मी तुषार म्हस्के ...पुन्हा आगमन करत आहे.....

प्रत्येक क्षणाला स्वताच्या शोधात फिरन आता मी काय करतोय ? आता मला काय करायच आहे ….सतत चिंतनात ठेवून कलाकाराच्या भूमिकेत


आणण्यासाठी स्वतःचा शोध घेणारी स्थिति ...आणि स्थिति निर्माण करण्यासाठी केलेली साधना ...म्हणजे कला साधना …या कला साधनेचा अनुभव 26 ते 30 नोव्हेंबर २०१६ ला शांतिवन मध्ये आला…या कार्य शाळेचे उत्तप्रेरक मंजुळ भारद्वाज ….
         स्वतः हरलेल्या स्थिति वर मात करत पुढे प्रवास करण म्हणजे जीवन ...आणि त्या स्थितिवर मात करण्यासाठी स्वतः बरोबर भांडण करुण स्वतः वर विजय मिळवनं म्हणजे जीवन 6 महिन्यापासून tor टीम पासून लांब राहिल्यानंतर समझल ...मी का जगतोय ?...मी कशासाठी जगतोय ?....मी

कोणासाठी जगतोय माझ्या जगण्याचा अर्थ केवळ पैसे कमवनं आणि घर संभाळन तर अस कोणीही करू शकतो …..आणि पैसे कमवल्यानंतर मग जीवनाच्या उत्तर कालावधीत मनाची स्थिति अशी नको आहे ….मी जीवनात ठरवलेलं पूर्ण नाही करू शकलो ….आणि पुढे अस ही वाटू लागल या झोपड़ पट्टीमध्ये आता राहतोय पण, त्याच्या नंतर फ्लैट मध्ये राहणार ….मग, या मध्ये माझ अस्तित्व काय मी आहे तरी कुठे ? ...आणि या दिवसात जाणीव झाली ...दबावाच्या ओझ्या खाली सर्व जन समाज , संस्कृति ,आपले लोक काय बोलतील म्हणून मनाची स्थिति नसतानाही जाऊन नौकरी कर लग्न करून बायको घर मूल ….यांचा दबाव घेऊन मरून जा ...हे सर्व डोळ्यासमोर येऊन माझ्या छातीवर बसलेत पण, मला अस बोलायच नाही आहे मी या सर्वापासून लांब पळतोय अस अजिबात नाही .. ...या मुलाने रूम घेतली ...याचं लग्न झाल ….पण, ते जगत आहेत तस मला काहीच वाटत नाही आहे याचा विचार कोण करत नाही आहे ….g f माझ्या घरातले विचारत आहेत मुलगा किती कमावतो ? ...पण, काय करतो याला काहीच फरक नाही पड़त ...हो , तिच्या मनासाठी नोकरी ही शोधू लागलो पण, interview ला गेल्यानंतर कोणी ठेऊन घेतलच नाही …..या दिवसात जेवन हे माझ्यासाठी त्रास झाले ...घश्या खाली घास जातच नसे ...रात्री मध्येच झोपे तून उठनं ..आणि विचार करत बसन ...अस किती दिवस जगणर ...चेहरा काळ्या रंगाचा होउ लागला ...जीवन कापतोय असा भास् या दरम्यान सर्वापासून लांब राहू लागलो जणू काही अंगावर खूप साऱ्या माश्या बसल्यात आणि माझ शरीर सडत जातोय...त्रास आणि ताप या मध्ये तो वेळ तो क्षण मला दबावा खाली ठेवत आहे याची जाणीव झाली...तरीही त्यातून उठण्याची हिम्मत काही होत नाही आहे...दरम्यान माझेच मित्र येऊन आरसा बनू लागले ...काय तुमच नाटक काय म्हणत आहे…..तुषार टेंशन मध्ये आहेस का तूझ्या तला स्पार्क कमी झालाय नेगेटिव वाटत आहेस ...या गोष्टी त्रास देत होत्या दुसऱ्या बाजुला अलिप्त राहून जीवन जगुयात अस वाटू लागल ...दरम्यान देशात झालेल्या हालचाली त्यातून जाणवू लागले ….यार , तुझ्या दुख या समाजा पेक्षा या राष्ट्रा पेक्षा मोठं नाही आहे ...आणि दबावाखाली खूप जगलो आता उन्मुक्त जगुयात ...चल तुषार , समजाला तुझ्या विच्यारांची गरज आहे ...अंगावर असणार हे परंपराचंओझ  झटकून विचार केला आणि निर्णय घेतला ...पुन्हा हिम्मत करून पुढे आलो  ...आणि तो हिम्मत करून येण्याचा निर्णय माझ्या साठी आत्म प्रेरणा आणि समाधान मिळवून देणारा दिसला ….म्हणजे अस जाणवू लागले या अथांग समुद्र किनार्यावर उन्मुक्त फक्त मी एकटा आहे ...आणि हा क्षण मला प्रेरणा देणारा आहे ….या प्रकाशात पाऊल टाकल्यावर या निसर्गातील ऊर्जा मला ताकद देत आहे हा भास ...ही शक्ति ….ही ऊर्जा ...मला मिळाली आणि त्यातून अचानक माझा चेहरा चमकू लागला….तेही 6 महिन्यानंतर ….समाधान काय असत ते मला त्यावेळी समजले….बस शांत ….शांत ….आणि शांत…..
             घरातून निघत असतानाच एकदम जोश मध्ये ...विचाराने ...मनाने आणि ध्येयाने पाऊल घराबाहेर …
या विश्वाच्या रनभूमिवर मी तुषार म्हस्के ...पुन्हा आगमन करत आहे असा मनात भाव….वाह ...वाह ….
स्वतःला स्फूर्ती देत मीच आहे विश्व विजेता मी जगावर नाही माझ्या मनावर विजय मिळवलाय आणि त्याचा आनंद काय असतो ते मला समजू लागले…..माझ्या डोक्यात एक चक्री वादळ सुरु झाले जे झंझावत आहे आणि त्याचा संघर्ष मला ताकत देत आहे हे जाणवले….आणि तोच संघर्ष खूप मह्त्व पटवून देणारा असतो हे पहिल्यांदा समजू लागले… मना मध्ये स्वतः प्रेरणा बनन किती आत्म सुख देणार असत हे जाणवू लागले…..
  

अंधेरी स्टेशन म्हणजे इतिहासात लिहून राहणार असे प्रसंग त्या स्टेशन वर plat form number 7 म्हणजे दोन अनुभवी कलाकार आज विश्व चिंतनात यात्रा करत जाणार ..plat form नंबर 7 वर पोहोचलो ….मंजुल भारद्वाज मस्त पैकी समोर उभे राहून वाट पाहत असताना दिसत होते ….माझ्यासाठी हा क्षण म्हणजे अति उत्साह कारण 6 महिन्यांनंतर मी भेटणार ...पहिल तर तो माणूस आहे तसाच आपली यात्रा सृजनशील बनवत नवीन नवीन आयाम शोधत आहे हे जाणवले . पॉलिटिकल हा माणूस आता बिनधास्त सामान्य माणसा मध्ये घुसून त्यांच्या मनाला प्रश्न पाडत अशी एक बिनधास्त चर्चा राजनीति वर ट्रेन च्या आवाजावर सुरु झाली आणि तिकडूनच उत्तुंग विचारांना सुरुवात झाली …

 शांतिवन मधील प्रवेश तो रस्ता ती झाड़े तो निसर्ग आणि साथिंचे प्रश्न हे मनाला पड़त होते आणि पटत होते ? 6 महीने तुझी आठवण येत होती कुठे
होतास तुला नाही आली का आठवण ….हो, आणि माझ्या मनात सुरु राहील 6 महिन्यात असा क्षण नव्हता की जेव्हा मी कोणाला विसरलोय ….आणि माझ्या आगमनाबरोबर माझ्या आत मध्ये होणारी प्रक्रिया ही उत्सुकतेने बह रून आलेली दिसली जीवना मध्ये ठेच खाल्ल्यावर अक्कल येते ही गोष्ट खरी ...शांतिवन मध्ये फक्त तो क्षण तुषार आला ….नाइक काका धावत पुढे येऊन मीठी मारली ...शम्भरकर अगदी आनंदात होते ...भानुदास ...आणि शान्तिवन जिथे फक्त मीच दिसतो आणि बाहेर च्या जगामध्ये मी दिसत नाही याची जाणीव झाली ...मनामध्ये स्वताला शोधायला सुरुवात केल्यावर तिकडे फक्त आपणच असतो ...आणि तो आपल्या अस्तित्वाचा क्षण दिसतो ….
आज शांतिवन फुलून आलेले दिसले शांतिवन मध्ये येण्याचा आनंद हा मनाला समाधान आणि तेज निर्माण करणारा ….थोड्या वेळासाठी गहिवरून गेल्यावर पुन्हा सावरले शेवटच समाधान हे tor देतो याची जाणीव झाली ...एवढे दिवस अशी परिस्थिती होती शरीर माझ तिकडे होत पण , मन माझं तिकडे नव्हत मन या प्रक्रियेमध्ये आहे हे समजले ...आता काय याच्यातूनच नवीन मार्ग शोधून काढायचं ….म्हणजे एक गोष्ट प्रकर्शाने सतत जाणवते कि आपण ज्यांना आपल म्हणतो ते नक्की असतात ...कि, विचाराने ध्येयाने आपल्या


बरोबर वाटचाल करत असतात ते आपल्या बरोबर असतात ...विचाराने जोडल्यानंतर ते विचार सतत  मनामध्ये जिवंत राहतात  हे जाणवू लागले …चैतन्य अभ्यास करत असताना येणारे अनुभव मनामधील कचरा साफ करून पारदर्शक करत आहेत हे जाणवले ...आता मला काम करायचं आहे याची जाणीव झाली त्यामुळे कोणाचेही ओझ डोक्यावर नाही आहे हे समजलं ….हिरव्यागार त्या माळरानावर चालत जाताना गवताचा बदलत जात असणारा रंग हा मनाला मोहून काढणारा …..त्या गावता मधून आम्ही कलाकार नवीन नवीन रस्ते शोधत जात आहोत आणि निसर्ग पदोपदी
आपले रंग बदलून आम्हा कलाकारांचे स्वागत करत आहे ….राजनैतिक चिंतक हा आपल्या भूमिकेवर ठाम असतो अनेक वादळ येत असतात ...अनेक लाटा येत असतात त्या लाटांना न घाबरता योग्य वेळ बघून प्रहार करतो ….आणि तो क्षण हा निसर्गामध्ये बदलाचा काळ असतो ज्या
ठीकानांहून एक काळ दुसऱ्या काळात परावर्तीत होत असतो ….त्या बदलत्या काळाला समजनं...हे चैतन्य अभ्यास करत असताना प्रात : काळच्या वेळेत अनुभव आले …..खूप दिवसानंतर मला हा खुराक मिळत आहे ..कारण, सहा महिने एकाच ठिकाणी बसून राहिल्यानंतर आपण आता  करत आहोत ते योग्य आहे हे समजले ….


  अनहद नाद चा performance :-

 हा जीवनातील सर्वात मोठा क्षण कारण अनहद नाद मध्ये आता भूमिका बदलल्या होत्या योगिनी आता performance करत नव्हती त्यामुळे अश्विनी , कोमल सायली ,तुषार ( मी ) आणि सिद्धांत आम्ही होतो ….त्यामुळे अनहद नाद कस करता येईल ? कस होईल याची शंका येत होती ….परंतु , अनहद नाद कोणाची व्यक्ती गत मालमता नाही आहे ती कलाकाराची यात्रा आहे ...कलाकाराच्या निर्माण चा संघर्ष आहे ...आणि त्यातून निर्मिती होत असते  ….आमच्या साठी निर्माण झालेलं आव्हन आम्ही स्वीकारलं आणि सकाळी ते perform केलं ….अनहद नाद सुरु झाला त्याच बरोबर



डोक्यामध्ये विचारांचा प्रवाह सुरु झाला आता पर्यंत सुरु असलेली यात्रा डोळ्यासमोर येऊ लागली त्याच बरोबर कोणत्या विचारांमध्ये मी अडकून राहिलो आहे ...कोणत्या परिस्थिती वर मात करायची आहे हे डोळ्यासमोर येऊ लागले ….आणि त्याच शब्दांमध्ये एवढी ताकत जाणवू लागली कि , माझ्या अंतर्मनात सुरु असणाऱ्या विचारांवर मात करून पुढे येऊ लागलो …फक्त विचार डोळ्यासमोर येत राहिले आणि त्या विचारांमध्ये फक्त मी दिसू लागलो …..कधी माझी स्थिती हताश झालेली होती तर कधी त्यावर मात करून पुढे जाणारी दिसली ….नदीसारखा प्रवाहामध्ये राहून गेल्यानंतर स्वतःशी सातत्य ठेवल्यावर मनामध्ये मंथन ची प्रक्रिया सुरु झाली त्याच बरोबर डोक्यात होणारी हालचाल हि खूप भयानक वाटू लागली एका मागून एक माझी छाया डोळ्यासमोर आली त्यामध्ये या ६ महिन्यात माझी होणारी हालचाल आणि या परिस्थिती मध्ये अडकलेला मी त्यातून खूप दिवसांनी बाहेर आल्यानंतर मिळालेला समाधान … त्यामुळे हा क्षण सोडावासा वाटला नाही ….शेवटचा क्षण येता येता डोळे पाण्याने बहरून




आले ...हृदयात हुंदके जागे झाले ...आणि  कितना विरोधाभास है ...दोनो नजरो और दृष्टीकोनो में ...च्या वेळेस जाणवल वितृष्ण म्हणजे मृत्यू जो जिवंत असतानाही जाणवत होता दुसऱ्या क्षणी उत्सुकता हि तशीच जाणवत होती ...कारण ते जीवन मी जगत होतो ...आणि त्या कारणामुळे आता मला पुढची जीवनाची यात्रा मला शोधायची आहे पण , या जीवनात चाकोरी करून घालवायची नाही आहे … हे समजत होत ...मनामध्ये विचारांचा काहोर वाढू लागला त्याच बरोबर मनामध्ये सुरु असणाऱ्या प्रतिमा डोळ्यासमोर धावू लागल्या एका मागून एक ...एका मागून एक ….अरे कोणी तरी आता थांबवा अशी परिस्थिती सुरु असताना …….अपनी आवाज सुनो ...चा स्वर कानावर पडतो आणि त्यातून स्वतावर विजय प्राप्त करून पुढे गेलेला जाणवतो स्वतावर विजय प्राप्त करून आनंदाने तो क्षण मी मिळवलाय याच समाधान मला दिसला आणि त्यामध्ये आम्ही सर्व कलाकार एक मेकांना मिठी मारून उभे असताना ...अचानक डोल्यामधून पाण्याचा प्रवाह वाढला आणि ह्रदयात दाबून ठेवलेला आवाज आतोनात बाहेर पडला ...किंकाळ्या आरोळ्या ...मनातून बाहेर येत होत्या डोक्यातून सर्व कचरा निघून गेला आणि शरीर खाली कोसळला ...काहीच शुद्ध राहिली नाही काय झाल माहिती नाही पण , मी फक्त जमिनीवर पडलेला उठल्यावर जाणवल सर्व मनातील गोष्टी निघून गेल्या होत्या आता फक्त राहिलो होतो तो मी ...माहिती नाही का पण , सर्व शांत झाल होत ..मंजुळ सरांनी आवाज दिला अब उठो … काहीच न करता उठलो ...अचानक ताकत आली कुठून हे अजूनही न समजलेला कोडं आहे ...त्यानंतर ..संध्याकाळी ५ वाजता शांतिवन कॅन्टीन च्या अंगणात शो … ती अनहद नाद च्या performance मुले खुलून आली हा प्रयोग शांतिवन मधील सहकार्यांसाठी राहिला स्टेज हा सारवलेल्या जमिनीचा ….त्यातच ती गादीसारखी एकदम मऊ पायांना लागत होती ती आनंदाची एक वेगळीच मज्ज्या येत होती ….अनहद नाद ची यात्रा सुरु झाली आणि त्याठिकाणी असणार वातवरण बदलून गेलं आणि अनहद नाद चा नाद शांतिवन मध्ये घुमू लागला …..

गर्भ नाटकाचा  performance :-
 

गर्भ नाटकाची प्रस्तुती म्हणजे स्वताला आपल्या अंगावर असणाऱ्या कपड्यांतून बाहेर काढन ...आणि ती चादर म्हणजे जातीची धर्माची ...परंपरांची .. याच्यातून बाहेर पडल्यानंतर ...बाहेर फक्त आपल्याला मोकळ आकाश दिसतो ...आणि त्या मोकळे पणाची जाणीव म्हणजे ...माणूस म्हणून जगण ...आणि तो माणूस आपल्या जीवनात समाधानी जाणवतो ….आणि हा अनुभव गर्भ नाटक performance असताना मला आला ...विंगेत उभा राहिल्यावर समजले ...खूप छान





वाटतय ...म्हणजे आनंदाच्या लहरी हृदयातून बाहेर येताना जाणवू लागल्या ..खूप कमी वेळात आम्ही प्र्स्तुत्ती करण्यासाठी उभ राहिलेलो होतो ...सुरुवातीला तर कुठे जायचं आहे काय करायचं आहे हे समजतच नव्हते ….मग ...प्रेम ,वात्सल्य जस कानावर पडला तसा आपोआप मंचावर खेचला गेलो ….अगदी सहज रीत्या आनंदाने मंचावर जगत आहोत हे जाणवू लागले ….मंजुळ भारद्वाज यांच्या लिहिण्याच हे वैशिष्ट्य आहे ...शब्दांमध्ये संघर्ष करतो त्यावेळी तो आपोआप शरीरातून आपल्या चेहऱ्यावर असणारया भावानाम्ध्ये दिसू लागतो ….त्यामुळे वेगळ काही



करायची गरज नाही लागत ….आणि कोल्हापूर नंतर आता पहिल्यांदा मी गर्भ performance करत आहे ...त्यामुळे ती एक वेगळीच उर्जा माझ्या आत मध्ये होती ...आणि नाहीतर ...६ महिने स्वत : ला कोंडून ठेवल्यानंतर दबून असणारा कलाकार आता बाहेर निघाला होता ...गर्भ नाटकाने माझ्या आत मध्ये कलाकाराचा अंश निर्माण केला ...आणि त्याला आकार अनहद नाद ने दिला ...त्यामुळे हि नाटके कलाकाराला आकार देणारी नक्कीच ठरू लागली आहेत ...या performnce   नंतर खूप शांत वाटू लागले ….कारण गर्भ नाटकाच्या प्रस्तुती मध्ये असणारी ताकत मला  मिळाली ….

रंगकर्मी चा performance :-

रंगकर्मी म्हणजे कलकाराची असणारी भूमिका ...आणि त्या भूमिकेमधून स्वताला सादर करण ..म्हणजे ते मोठ आवाहन आज सर्वात मोठी जबाबदरी आम्ही tor कलाकार तसेच कार्य शाळेत सहभागी झालेले



कलाकार आज एकत्र performnce करणार वेळ सकाळी ७ वाजता  ...सूर्य उगवण्याची वेळ ...आणि तोच सूर्य कलाकार आपल्या हृदयामध्ये निर्माण करण्याची वेळ हि एकच ….नदीच्या त्या पात्राच स्टेज ...जिकडे २ वर्षा पूर्वी आवाज ऐकला होता .मैं कौन हूँ ….क्या हूँ ..इसकी मुझे अब कोई  चिंता नहीं हैं ….आज तेच शब्द माझ्या कानावर सूर्यांच्या किरणाबरोबर पुन्हा ऐकायला येऊ लागले .त्या ..सुंदर नदीच्या पात्रात ...सकाळी पडलेलं धुक ….रंगकर्मी ...रंग प्रयोग करण्यासाठी स्वताला प्रवाहात ठेवत नदिपात्रात उभे आहेत …..आणि ७ वाजता त्या पात्रात प्रेक्षक त्या नदी च्या किनाऱ्या वर उभे ...आणि लोक बोलतात सकळी ७ वाजता प्रेक्षक येत नाहीत ...इथे तर नदीच्या पात्रा भोवती performance पाहण्यासाठी उभे होते ….एक


दर्शक नेहमी कलाकाराच्या शोधात असतो ….चांगल्या कलेच्या शोधात असतो ...म्हणून , एक सूत्र त्यावेळी समजल आपण कलेच सादरीकरण करत रहायचं प्रेक्षक आपोआप त्याठीकाणी येतात ...आम्ही नंतर प्रेक्षकाना त्या अनुभूती दिल्या आम्ही प्रत्येक कलाकाराने एका एका प्रेक्षकाचा हात धरून त्यांना त्या पात्रात उभे केले …त्यांचा आलेला अनुभव हा जबरदस्त ...अनमोल होता ….त्याच ..नदीच्या पात्रात प्रवाह विरुद्ध बोटीत आम्ही कलेचे शिल्पकार उभे राहिलो नवीन इतिहास घडवणारी  बोट या महासागरात विश्व जिंकण्यासाठी निघाली आहे हे जाणवू लागले  …

या कार्यशाळेत मला जिद्द मिळाली जिंकण्याची जी विश्वात आपल नाव स्थापित करण्यासाठी अनुकूल आहे ...जी स्वताच्या संघर्षामधून जगाला दिशा देणारी आहे ….हा अनुभव मला 26-30 नोव्हेंबर 2016 ला शांतीवन मध्ये आला ….

रंगकर्मी
तुषार म्हस्के

Wednesday 14 December 2016

३० दिसम्बर के बाद होगी आपकी अदालत ... रंगकर्मी - तुषार म्हास्के

अब तो हद्द हो गई देशभक्ति का नारा इस तरह चल रहा है .....भाईयों और बहनों ....
अब तो मैं सोचने लगा हूँ ...अब मुझे समझ आ रहा है ....अरे यार सोचने का समय अब नहीं है ...अब ३० दिसम्बर तक सब जन राह देख रहे हैं ... आप तो खुले आम बोले थे ५० दिन का समय ...आपको जनता ने ये भी अच्छे दिनों के झांसे में दे दिया हैं ....अब तो आप को सोचना नहीं है ...अब जनता सोचेगी ....भाईयों और बहनों ..मरने वाला कोई अमीर नहीं रहा ....
लाइने गरीबोंने लगाईं ...जिसे आप काला धन कहते हो ....गरीबोंने लाइन में खडा रहकर निकाला ...बीजेपी नेताओं के बेटियोकी शादी शाही रुबाब में होती गई ...हमारी बेटीयाँ हलद चढ़ाएं लाइन में खड़ी रही ....किसानोकी फसल खराब होगई ...नई फसल बोने के लिए पैसा पैसा करते इन्तजार करते रहें ...आपके झांसे कम नहीं हुए सामान्य

जनता को चोर कहने की नौबत आई .....तभी भी जनता इस आपमान को अनदेखा करते रही ....क्योंकि आशा की किरण अच्छे दिनों का झांसा देते रही ......अपने रिश्तो दारोंसे झगड़कर जनता आपके साथ खड़ी रही ....अब जब पैसा बीजेपी नेताओंसे निकलने लगा ....लाइन में खड़े ना रहकर

पूंजी पतियोंके पास से बारामत होने लगे ...और हमारे भाई - बहन ,चाचा - चाची , दादा - दादी ,बेटा - बेटी , मां -पिताजी लाइनों में २००० के नोटों का इन्तजार करते रही .....साधारण व्यापारी रोने लगा चंद पैसे के लिए अब रोने लगा ....काला धन तो रोका नहीं आप तो विपक्षोके सवालोनेसे भागते रहे .....हमारा पैसा बिग बजार में तो पहुँच गया ...किन्तु सरकारी बैंक में पैसा अभी तक गया नहीं .....दिनभर काम करके पैसा लेने वाले भाई ....एक महीने से काम करते रहे पैसे की बात दिल में दबाए काम वाली बाई बरतन मांजते रही ....
एक के पीछे दुसरा दिन कांटते रही ....उस परेशानी को बिना समजे हमारे सूट बूट वाले भाई कार्ड हात में लिए नाचते रहे ...और दुनिया को देशभक्ति का पाठ पढ़ाते गये ....उस गरीब के दर्द को ना समजकर .आपके भक्ति का प्रचार करते रहे ....ये कैसी संवेदना हैं ....जो एक दुसरे को टिका - टिप्पणी करने लगे .... डिजिटल इंडिया का झांसा सामने आया .....काले धन का परिवर्तन कैशलेस में हुआ ....आपके नेता जनता पर काले धन रखने वाला कहने लगी ...क्योंकि जिसके पास पैसा नहीं दिखा वह २,५०,००० के उपर बैंक में जमा होनेसे चोर कहने का अवसर उनके सामने आया .....वहीपर जनधन वाले खाते बदनाम होने लगे ....लोगो के हित वाले खाते लोगोंके दुश्मन होने लगे ....अपना पैसा अपने लिए मुसीबत बन गया और उस पैसे का हाल बेहाल होगया ...जनता को डर लगने लगा कहीं उनके उपर आरोप तो नहीं लग रहे हैं .....कितने अमीर लोगो ने पैसे को जला दिया ,कितनो ने लुटा दिया कितनो ने advance payment दे दिया ....काला तो काला न रहा उसे ५० % देकर सफ़ेद किया गया ....इतना सब होने के बाद corruption तो रुका नहीं ...लाखो करोडो के नए नोट बारामत होने लगे ...आपने सफेद धन ने उसे सफ़ेद नहीं रखा आपकी सिस्टम ने उसे भी काला बना दिया ....आप के निर्णय से लिया गया फैसला ...आपने कहाँ था corruption होगा नहीं ...तो इतना पैसा कब और कैसे बाहर
निकला उसमें आपके बनाए नये नोट दिखने लगे .....क्या मोदीजी सवाल उठता है आप पर ...तो अच्छे दिनों का झांसा क्यों दिया ...क्यों हमारे भाइयों को लाइन में खडा किया गया ...अपने पैसे के लिए तडपना पडा ...और अभीतक पैसा हात में आया नहीं ...हवाला कारोभारी पैसे लेकर मालामाल होते गये .....किसानों का अनाज रास्ते पर ...खडा खडा सड़ रहा हैं ...इसपर कोई बोला नहीं ....किसीने आवाज उठायी तो उसे देशद्रोही बनाया गया ...बाबा रामदेव जैसे लोग ...अर्थ निति कार बन गये ....बर सामान्य जनता बरदाश्त करती रही ....यहाँ पर डिजिटल उपयोग लोग करेंगे तो उसका tax २ से ३ % भरेगा कौन ...जो कैश पे नहीं उसका तो जिक्र भी नहीं हुवा ....मोदीजी
जियो को बेचने लगे ...मालुम गिरा तो ५०० रु जुलमाना देकर छोड़ा गया ...अब मोदीजी paytm की advtg पे नजर आने लगे ....क्या बात है डिजिटल इंडिया सामने दिखने लगा ....अब कल रात को सुचना मिली आपका मोबाइल सेफ नहीं
उसे कोई भी हैक कर सकता है ...आप ये app ना रखे ...अब जिसे हैक करना हैं वो तो करेगा ....क्या हवा आपका डिजिटल के सपने में अब डर लगने लगा ....अब ये बात बोलना मैं अब सोचने लगा हूँ ...समजने लगा हूँ ...भाईयों और बहनों .....ये बातों को जनता भूलेगी नहीं .... ३० दिसम्बर के बाद होगी आपकी अदालत ...भाईयों और बहनों .....फिर आयँगे अच्छे दिन ....





रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Wednesday 7 December 2016

10 World Thinkers of Theatre


1. Manjul Bhardwaj 

        Manjul Bhardwaj is an actor, director, writer, facilitator and initiator in theatre. He is from Dakhora,[1] a village in Rewari District in Haryana, India. For past two decades, he is based in Mumbai and dedicated himself for creating "The Theatre of Relevance". As a writer and director, he has written and directed more than 25 plays.[2]


2. Badal Sircar 

       Badal Sircar (15 July 1925 – 13 May 2011), also known as Badal Sarkar, was an influential Indian dramatist and theatre director, most known for his anti-establishment plays during the Naxalite movement in the 1970s and taking theatre out of the proscenium and into public arena, when he founded his own theatre company, Shatabdi in 1976.


3. Augusto Boal

        Augusto Boal (16 March 1931 – 2 May 2009) was a Brazilian theatre director, writer and politician. He was the founder of Theatre of the Oppressed, a theatrical form originally used in radical popular education movements. Boal served one term as a Vereador (the Brazilian equivalent of a city councillor) in Rio de Janeiro from 1993 to 1997, where he developed legislative theatre.[1]


4. Richard Schechner

        Richard Schechner is a University Professor and Professor of Performance Studies at the Tisch School of the Arts, New York University,[1] and editor of TDR: The Drama Review.


5. Peter Brook

         Peter Stephen Paul Brook, CH, CBE (born 21 March 1925) is an English theatre and film director who has been based in France since the early 1970s. He has won multiple Tony and Emmy Awards, a Laurence Olivier Award, the Praemium Imperiale, and the Prix Italia. He has been called "our greatest living theatre director".[1]


6. Jerzy Grotowski 

          Jerzy Marian Grotowski (Polish pronunciation: ['jɛʐɨ grɔ'tɔfskʲi]; 11 August 1933 – 14 January 1999) was a Polish innovative theatre director and theorist whose approaches to acting, training and theatrical production have significantly influenced theatre today. He was born in Rzeszów, in South-eastern Poland in 1933 and studied acting and directing at the Ludwik Solski Academy of Dramatic Arts in Kraków and Russian Academy of Theatre Arts in Moscow.


7. Bertolt Brecht

           ugen Bertolt Friedrich Brecht (/brɛkt/;[1][2][3] German: [bʀɛçt]; 10 February 1898 – 14 August 1956) was a German poet, playwright, and theatre director of the 20th century. He made contributions to dramaturgy and theatrical production, the latter through the tours undertaken by the Berliner Ensemble – the post-war theatre company operated by Brecht and his wife, long-time collaborator and actress Helene Weigel.[4]


8. Vsevolod Meyerhold

             Vsevolod Emilevich Meyerhold (Russian: Все́волод Эми́льевич Мейерхо́льд; born German: Karl Kasimir Theodor Meiergold; 9 February [O.S. 28 January] 1874 – 2 February 1940) was a Russian and Soviet theatre director, actor and theatrical producer. His provocative experiments dealing with physical being and symbolism in an unconventional theatre setting made him one of the seminal forces in modern international theatre.


9. Constantin Stanislavski

             Konstantin Sergeievich Stanislavski (né Alexeiev; Russian: Константи́н Серге́евич Станисла́вский; 17 January [O.S. 5 January] 1863 – 7 August 1938) was a seminal Russian theatre practitioner.[2] He was widely recognised as an outstanding character actor and the many productions that he directed garnered a reputation as one of the leading theatre directors of his generation.[3] His principal fame and influence, however, rests on his 'system' of actor training, preparation, and rehearsal technique.[4]


10. Bharat Muni

               Bharata Muni was an ancient Indian theatrologist and musicologist who wrote the Natya kalai , a theoretical treatise on ancient Indian dramaturgy and histrionics, especially Sanskrit theatre. Bharata is considered the father of Indian theatrical art forms. The Nattiyam comprises 36 chapters and it is possibly the creation of more than one scholar. It dates from between the 3rd century BCE and the 1st-century CE.[1

Wednesday 7 September 2016

शेतकरी मावळा संघर्ष करायला विसरलाय .... तुषार म्हस्के

कसले हे वारे वाहु लागले ?औदयोगिक क्रांतीचे की, माणसातील माणुसकी संपवण्याचे..माणसा माणसातील स्वप्नांचे की, एक एकमेकांना खाली खेचण्याचे...सुरळीत जीवन जगण्याचे की, मालमत्तेवर एकाधिकार जमवण्याचे....या विकासाच्या पट्टीत मी बळी पड़लोय ....माझ अस्तित्व नाहीस होत चाललय....तरुण म्हणून मी संपत चाललोय...माणूस मी हरवत चाललोय ....माझ्यातील संवेदना ही संपत चालल्या आहेत ...मी माणसामधील माणुसकी हरवून पुन्हा प्राणी होत चाललोय ...का ? मी माझ्या संवेदना माझी निर्णय क्षमता हरवत जात आहे ....जगण्यासाठी अन्न लागत आणि ते मी शेतात पिकवतोय ...जीवन जगण्यासाठी लागणारी सर्व अन्न धान्य मी शेतात पिकवायच सोडून का मी गुलांमगिरिकडे वळलोय ?का माझ अस्तित्व मी हरलोय?....एका शेतकाऱ्याच  पोरग म्हणून मी का शेती करुन माझी आणि देशाची उपजीविका भागवत नाही ? का मी माझ सत्व हरवत चाललोय ? ‘’ हो ‘’  एका बाजूला बरोबर आहे........की, का करू मी शेती ? कारण, मला लग्न करण्यासाठी मुलगी ही नाही मिळत ,कारण त्यांना हवा असतो शहरात शिकणारा मुलगा, तो चांगली नोकरी करणारा असावा त्याची

मुंबईत स्वताची रुम असावी मग, तो हॉटेल मध्ये भांडी घासणारा असेल तरीही चालेल ....पण,  स्वताच्या शेतात ....स्वता राजा सारखा जगत असणारा नको ? ....अरे हा एक प्रश्न आहे राजा कुठे ? गुलाम कुठे ?तरीही आम्हाला नोकरी हविच गुलामी साठी .....जास्त टेंशन नको दर महिन्याला एवढे पैसे घरी यावेत .....त्याच्यामध्ये अड़कलोय ....काय करणार शेतकरी? कारण , शेतकरी बोलला की, तो आम्हाला गरीबच दिसतो .....म्हणजे एका बाजूला काय मज्जा आहे शेतातला राजा गरीब ,आहो प्रश्नच आहे ना ?....आणि  खरोखर दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आहे ....मी माझ्याच शेतात गुलाम आहे कारण, पाऊस कधी पडेल आणि त्यानंतर मी धान्य कधी पिकवेल  ? आणि त्यानंतर मी नियोजन कधी करेल ?  हा प्रश्नच आहे ....आणि निसर्गाने साथ दिली तर ठीक आहे आणि नाही दिली तर मी बरबादच मग , माझ पुढच नियोजन संपत आणि मी वेडयासारखा आपली जागा जी हक्काची आहे ती सोडून कुठे तरी 10 x 10 च्या रुम मध्ये येतो .... आणि विचार करत असतो की माझ्या मुलांना चांगल शिक्षण द्यायच पण, त्यात आपण  एक गोष्ट विसरतो ती म्हणजे राजा सारख मुलाला जगयाला सांगतो आणि आपण स्वता एक नौकर म्हणून जगत असतो आणि गुलामी करत असतो त्यामध्ये स्वतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आपला कधीच राहत नाही आणि या चाकरी च्या शोधात भटकणारा चाकर मानी  चाकरी च जीवन जगायला आपल्या मुलांना  लावतो कारण, तो आपले नैतिक अधिकार आणि तत्व  विसरलेला   असतो आणि या मुंबईच्या 80, लाख सामान्य  माणसांमध्ये तो हरवून गेलेला दिसतो ....काय गम्मत आहे ? आणि शेतामध्ये काम करताना आपल् नियोजन आपल्या शेतात पिकणाऱ्या धान्याच् नियोजन केल्यावर एक व्यवस्थित समाज सुरळीत आयुष्य जगता येईल हे विसरून जातो....हो आणि एक मज्जा आहे ती म्हणजे अशी..... हा 12 महीने शेतात राबणारा शेतकरी आणि शेतात पिकणाऱ्या  त्याच्याधान्याला दर हा दलाल ठेवतो ...का ?  असा प्रश्न पड़त नाही  या शेतकर्यांना ? मी देशाचा शेतकारी आणि मी पिकवतो त्याचा दर मला ठेवण्याचा अधिकार मलाच नाही ?  ...का हे विसरुन जातो हे दलाल शेतकऱ्याची कोंडी करत चालले आहेत ,त्यांना आता लाथ मारण्याची वेळ आली आहे ...आता शहराचा विकास होतोय , शहराची जागा वाढली आहे ...आणि या शहराच्या विकासात माझी जमीन बळकावली जाते  ‘’ अरे ‘’ , मुर्खानो.. शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला का मारत आहात ? का आमच्या जमीनी करोड़ोंच्या अमीषा खाली विकत घेत आहात ? कशासाठी म्हणजे आम्हाला छोट्याश्या पैशाच अमिश दाखवून आमची जमिन बळकावत आहात ? याच्याने सर्व पैसा एकदम हातात येतोय पण, तो पैसा हातात आल्यानंतर हातातून जमीन
जाते ...मग, फक्त घर राहत आणि हा पैसा ....मग, दारु पिऊन पैशाचि उधळपटी होते ....आजार वाढतो आणि हा मग , माझा खेळच् संपतो आता , यावर काय करणार ? पैसा आला जमिन गेली हातात फक्त आणि फक्त दारिद्र्य विकास कोणाचा होतोय? शेतकऱ्याचा की भांडवल दारांचा ,  दलाल मंडळीचा  कि , राजकर्त्यांचा ....आणि शेतकारी हा कुठे एकत्रित दिसतच नाही संपला आहे की संपत चाललाय ? ...दुसऱ्या  बाजूला औद्योगिक विकास महामंडळ ( midc)  क्षेत्रात असणाऱ्या कंपनी म्हणजेच उदा . महाड  midc .....इथे असणाऱ्या कंपन्यांमध्ये निर्माण होणारा केमिकल , आणि त्याच्या निर्मिति साठी सोडला जाणारा वायु हा एवढा घातक आहे की , काही तासांसाठी या कंपनीच्या आजुबाजुला असणाऱ्या गावांमध्ये मी ( तुषार म्हस्के ) गेलो काही मिनिटांमध्ये माझ  डोक दुखायला सुरुवात झाली ,काही क्षण घसा एकदम दाबल्यासरखा झाला श्वास घेत असताना उलटी होते की काय अशी परिस्थिति निर्माण झाली ....मग , अशा वेळेस प्रश्न निर्माण झाला की, इथे राहणाऱ्या गावांमधील लोकांना काही त्रास होतो की ,नाही?  काही ठिकाणी अस जाणवल की ,सर्वाना त्रास होतोय डोके दुखी , छाती मध्ये जळजळन , पण का होते याची जाणीवच नाही ...आणि अस ही समझल की, कोणी आवाज उठवला की,त्याला पैसे देऊन गप्प करण यासारखे विषय होत असतात.... आता करणार  तरी काय  ? मग , थोड़ा वेळ शांत राहून आयुष्यभर भोग आलिया भोगाशि असे निर्णय घेतले जातात ...एका बाजूला ही गुलामशाही काही संपत नाही जी विकासाच्या नावखाली दाबली जाते केमिकल कंपनी मध्ये काम करणारा व्यक्ति किती वर्ष आनंदाने जगतो हेही आपल्याला माहितीच् आहे तरीही काम करा .....आणि आयुष्य घालवा ...पण, शेतामध्ये नियोजन करुन काम करण आम्हाला जमत नाही....काय करणार हा प्रश्न  डोळ्यासमोर येतोच ?......किती हे प्रश्न त्याची किती ही उत्तरे ? पण त्यातून कोणीतरी कृष्ण  , कोणीतरी शिवाजी येईल आणि आम्हाला वाचवेल आणि त्यातून आमची सुटका कधी होईल हे आम्हालाच माहिती नाही .दुसऱ्या  बाजूला राजकीय नेत्यांना आपण  आपल् मानतो पण , ते तर आपलाच फायदा करून घेत चाललेत अरे , आपलेच g r , आणि पेपर वर काम दिसतात पण ,  प्रत्यक्षात रस्ते की खड्डे ,की खड्यात  रस्ते अशी परिस्थिति निर्माण होते....तरीही आमचे साहे ब ……  साला लाथ मारा अशा हराम खोर साहेबांना ……. चला एकत्र येऊन संघर्ष करूयात.... ....अशा नविन सकाळची वाट पाहतोय जिथे मी एक शेतकरी.. माझा निर्णय मी घेणार आणि एक नवीन महाराष्ट्र घडवणार ...विकास आपल्या शेतीतून करणार आणि हे दाखवून देणार की , हे सुंदर जीवन माझ आहे .... एका शेतकाऱ्याच् आहे ....
एका बाजूला होत असणाऱ्या  रास्त्यांच् रुंदीकरण  त्यामध्ये जाणारी जामीन,  कापली जाणारी झाडे ....पडणार पाऊसाच पाणी कसा जमिनित झिरपणार ? अरे गावांमध्ये घरा समोर असणारी  आंगन ही आता मातीची राहील नाही ते सीमेंट च झालय आणि या अंगनात पड़नार मातीच पाणी हे वाहून चाललय ...आणि विकास हा शेतकऱ्यांच्या मेलेल्या शरिरावरचा लोनी खात बसला आहे.... तरीही आम्ही विकास करणार आणि आपल्या जमीनी विकुन स्वताला संपवणार ....फक्त शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात केला जातोय त्यामध्ये मोठ मोठी विमानतळे बांधली जात आहेत …..त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनी साम , दाम , दंड , भेद या तत्वांचा वापर करून बळकावल्या जात आहेत …..आणि त्याला हा शेतकरी बळी पडतोय …उदा .  उरण मध्ये तयार होत असणार अंतरराष्ट्रीय विमानतळ ….विकासाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या जमिनी ….त्याठिकाणी विमानतळ होणार आणि प्रश्न आहे कि किती जमिनी विकणारे शेतकरी या विमानातून प्रवास करणार ? हा प्रश्नच आहे ना …..आमच्या देशाच्या बजेट मध्ये शहरांमध्ये a.c लोकल सुरु झाली आता लवकरच बुलेट ट्रेन सुरु होणार मग , किती शेतकरी त्यातून प्रवास करणार ? …...अरे ….मुर्खानो आता तरी जागे व्हा …..दळणवळण व्यवस्था हवी ...पण आता पर्यंत अशी काही गावं आहेत  ज्या ठिकाणी परिवहन महामंडळाची गाडी जातेय ..का? प्रश्न पडत नाहीत ? काय हि महाराष्ट्रामधील जनता एवढी गरीब , एवढी बेचारी , एवढी गुलाम झाली आहेत हे एक न संपणार कोड निर्माण झालय  
आहे …...काय  ? प्रश्न पडतो एका बाजूला शिवाजीला मानत असणारा हा शेतकरी मावळा संघर्ष करायला विसरलाय ....एकत्र रहायला विसरलाय ....जाती व्यवस्थेचा शिकार झालाय ..मग, फायदा घेऊन राजकारण करण सोप होऊन गेलय आणि फक्त शेतकरी निराश होऊन गेलाय ....आता मी संघटीत होऊन  संघर्ष करतोय आणि मी माझ राज्य निर्माण  करतोय हे ऐकण्यासाठी , हे पाहण्यासाठी डोळे आतुरलेत बदलाची वाट पाहत आहेत......


















तुषार म्हस्के
(९०२९३३३१४७)

Tuesday 9 August 2016

नवा यलगार क्रमश :1

माझ्यासाठी short film बनवन हा अनुभव नवीन नव्हता ….हो फक्त त्याला आता दिशा मिळाली ….आणि जाणीव पूर्वक करत असल्याची जान झाली….थियेटर ऑफ़ रिलेवन्स नाट्य सिद्धांत प्रकियेमधे ….सिंधुदुर्ग ला “ संघर्ष शेतकर्यांच् “ हे छत्रपति शिवाजी कृषि विद्यापीठ मधील मुलांबरोबर नाटक करत असताना संघर्षा मध्ये असणारा शेतकरी जानवला आणि त्यानंतर मनामध्ये प्रश्न निर्माण झाले 




….आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या ….बेबसी , बेचारी, आणि गरीबी सारखी दिसनारी अवस्था जानवली आणि त्याचा महत्वाच् कारण समझल की, शेतकरी हा आपल्या मालचा दर ठरवत नाही तो दलाल ठरवतो ….आणि शेतकरी फक्त नावाला राजा आहे परिस्थिति मात्र उलटी आहे ….खुप दिवस झाले मनात चैन पड़त नव्हते ….हां विषय कसा मांडायचा याच्याच् विचारात होतो ….दुसऱ्या बाजूला होत असणारी धावपळ त्यामुळे या विषयाच मंथन मनामध्ये सुरु होतच …..सुरुवात कशी करायची हा प्रश्न ...त्यातून मनात विचार आला गावी जाउन मूलांचे वर्क शॉप घेऊन हा विषय मांडू यात पण त्यात मी काही ठाम होत नव्हतो….शेवटी short film बनवन्याची संकल्पना डोळ्यासमोर निर्माण झाली ….आणि विषयाला मांडायला सुरुवात केली….आता शॉर्टफिल्म बनवनार तर टीम हवी आहे ...कस करायच ? काय करायच ? हे मला काही माहिती नव्हते ….गावी जाउन विषय पोहचवन्यासाठी short film चा सहारा घेतला … सहजच गावी गेलो ….पाहिल तर कोणाचा रिस्पॉन्स नव्हता मग पुन्हा मुम्बई ला आलो मग फोन वरुण संपर्क साधायला सुरुवात केली एक एक धागा जोड़त पुढे जायच ….नाशिक च वर्कशॉप संपल तसाच 31 तारखेला ठाणे ला गेलो ….तिकडे संकल्पना ऐकवली आणि दुसऱ्या दिवशी bag उचलून गावी ….दरम्यान संकेत बरोबर बोलन केल होत त्या अगोदर ….थेट गावामध्ये जाउन लोकेशन बघायला सुरुवात केली ….मग, बोलताना संकेत ला सांगितल गावची मीटिंग घेऊन हा विषय मांडायचा आहे ….संकेत ने मीटिंग ची सुचना ठराविक लोकांपर्यन्त पोहचावली त्यामध्ये अंदाजे 70 ते 80 गावामधली माणसे आली होती ….मीटिंग ला जाण्या अगोदर आपले मुद्दे वहिवर मांडले काय काय बोलायच आहे ते लिहील ...कारण , माझ्यासाठी आपल्याच गावातील मानसांसमोर बोलन थोड़ कठीन होत त्यामुळे थोड़ी दूर अवस्था चेहऱ्या वर झाली होती ….संकेत ला ते थोडा फार जानवल आणि जेवताना तो बोलला एवढं काय टेंशन घेतोय करतील लोक मदत ….त्याच वेळी जानवल आता मला ज़रा लीडर सारख रहावे लागणार आहे 




….एकदम खंबीर , निर्णयशील , आणि विचारशील … जेवण झाल्यावर उठलो आणि ताबडतोब जाउन कपडे chenge केले …. आणि मी तयार झालो …कपडे बदलले आणि विचारही आपोआप बदलले होते त्यामुळे अचानक तेजस्वी जानवायला लागले होते….मीटिंग ची वेळ 9 वाजता ठरलेली होती …..1 जून 2016 रात्री 9 वाजता ….गाव माटवन , तालुका पोलादपुर , जिल्हा रायगड ….माझ्या मनात क्रांती निर्माण करणारी मीटिंग ठरली ….आर आणि पार च्या या लढाईत विचारांच् मंथन होत होत ….संकेत ची प्रस्तावना करुण झाल्यानंतर त्याने ही सभा माझ्या हातात दिली ….लघुपटाची संकल्पना सांगितली आणि सध्याची शेतकार्यांची बाजू सांगीतल्यावर … थोड़ा वेळ सर्व जन शांत होते ….नंतर बोललो शेतकरी आपल्या मालाला दर ठरवत नाही यावर तुम्हाला काय वाटत ? अस विचारल्यावर काही वेळ मीटिंग शांत नंतर प्रत्येक जन बोलायला लागला आणि त्यांच्याकडून उत्तरे येत होती ...कस शक्य आहे ? आमच्याने होणार नाही ? हां आपला अधिकार नाही ….आणि माझे डोळे चमकू लागले कारण शार्टफ़िल्म मधला हा सीन डोळ्यासमोर दिसत होता ...मग , सांगितला की आपल्या आन्दोलनाचा प्रकार वेगळा आहे आपण आंदोलनाला न जाता बदल घडवून आनण्यासाठी ही शार्ट फ़िल्म बनवत आहोत…..आणि सर्व जन ताबडतोब तयार झाले होते….लगेच लगेच त्यांची उत्तर येत होती आमच्याकडून काय काय अपेक्षित आहे बोललो मला दोन सीन मध्ये तुम्ही सर्वं जन हवी आहेत ...आणि तुमच सहकार्य ….आता सर्वजन शूटिंग बोलल्या नंतर कुतूहल आणि आनंदी होतेच ...मग , शेवटी मी माझा आर्टिकल वाचला जो शेतकर्यांवर लिहिला आहे तो आणि तो वाचत असताना प्रत्येक जन शांत ….त्या हनुमानाच्या मंदिरात एकदम शांतता पसरलेली ….प्रत्येक जन आज जागा झालेला दिसला ...आज माझ गाव हे राजकीय विषयावर बसून चर्चा करत असताना दिसत आहे हे जाणवू लागले वा ! क्या बात है ….आणि माझ्या गावच्या मानसांची एक ख़ास गोष्ट आहे विषय गावाच्या लेवल चा असतो त्यावेळी तो विषय सर्व जन उचलून धरत असतात ….त्या आर्टिकल च्या वाचन झाल्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया या खूप अनोख्या होत्या त्या म्हणजे ...अंगात रक्त सलसलत होत आणि आत मध्ये आग लागली होती….ही ऊर्जा घेऊन मी पुन्हा मुम्बई मध्ये आलो…..
तुषार राजेश्री तानाजी म्हस्के 

नवा यलगार 
क्रमश :1

Saturday 23 April 2016

मिलाप...

मिलाप विचारांचा ,
माझ्या स्वप्नांचा ,
माझ्या अस्तित्वाचा ,
माझ्या निर्माणचा .....

मिलाप माझ्या तत्वांचा आणि विचारांचा,
सतत स्वत : ला शोधून जाणीव पूर्वक बदलाचा ,

विचार माझ्या ध्येयाचा ,
ध्येयासाठी संघर्षाचा ,

मिलाप माझ्या सहसाथींचा ....
संवाद माझ्या आत्मस्वरूपाचा ,
माझ्या विचारांना दिशा देण्याचा ,

मिलाप तन ,मन आणि विचारांचा ,
मिलाप हा सहवेदनांचा ,
मिलाप हा एकात्मतेचा ...
सक्षम देश निर्मितीचा ....
सक्षम विचारांचा .......


तुषार राजेश्री तानाजी म्हस्के  

Wednesday 13 April 2016

“ मी भारत माता की जय बोलणार नाही : मला माझ्या DNA वर विश्वास आहे ” - तुषार म्हस्के


भारत माता कि जय नाही बोललो तर तुम्ही देशद्रोही 
ठरवणार माझ्याच घरामध्ये मी काय सकाळीउठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत .... भारत माता कि जय बोलायचं ? ...मी भारत माता कि जय बोलणार नाही ...कारण, मला माझ्या DNA वर विश्वास आहे ....आणि हा प्रश्न केंद्र शासनाचा ,राज्य शासनाचा आहे ...हा प्रश्न माननीय महाराष्ट्राच्या मुख्य मंत्री साहेबांचा आहे .....आज मी भारत माता कि जय नाही बोललो तर मी देशद्रोही कसं काय होऊ शकतो ? हे नारे देश स्वातंत्र होत असताना लावले होते त्याचा उद्देश देश स्वतंत्र होणे हा  होता आता भारत माता कि जय नारे लावणारे हे सरकार नक्की काय मागत आहे ? स्वतंत्र कोणापासून .... अरे मुर्ख्यानो तुमचंच राज्य आहे केंद्रा मध्ये आणि राज्यांमध्ये ...तुमचीच सत्ता आहे आणि तुमच्याच सत्तेत भारत माता कि जय नाही बोललो तर तुम्ही देशद्रोही ठरवणार ...म्हणजे इथे तुम्ही या महाराष्ट्राचे या देशाचे कुटुंब प्रमुख आहात आणि कुटुंब प्रमुख कधी बोलतो का ? आपल्या मुलांना ...तुम्ही भारत माता कि जय बोला नाही तर तुम्ही माझी मुलं  नाहीत ....असं देशाच्या, जगाच्या इतिहासात कोणी बोललं आहे का ? .....साहेब तुम्ही असं कशासाठी बोलताय ? आणि कोणासाठी ? ...तुम्ही एक जबाबदार पालक म्हणून आपल्याच मुलांमध्ये वाद निर्माण करत आहात ...का तुम्ही महाभारतातील शकुनी मामा बनत आहात ? ...अहो , तुम्हाला याच्यातून साध्य काय करायचं आहे ? ....का....तुम्हाला आपापसात कलह निर्माण करायचं आहे ....आणि मला अभिमान आहे भारत भूमीच्या कुशीत जन्मल्याचा आणि मी भारत माता कि जय नाही बोललो आणि माझ्यासारखे हजारो ,लाखो लोक नाही बोलले ...तर माझी योग्यता कशी काय ठरवू शकता ? ...अहो या भारताचा नागरिक म्हणून मी संविधानाचा आदर करतोय ...समानता या वैचारिक तत्वाने जगतोय ...त्याचबरोबर  income tax , traveling tax ,service tax ,वस्तू खरेदिवरील tax भरतोय अजून आहेत नाहीत ती सर्व tax भरतोय ....हे कशामुळे करतोय साहेब ? ...हा एक प्रश्न आहे ना ....त्याच फक्त आणिफक्त उत्तर आहे भारताचा नागरिक आहे म्हणून ...साहेब ......माझे मित्र सर्व धर्माचे आहेत .....हिंदू ,मुस्लीम ,शीख ,इसाई त्यातून मी भारताची एकात्मता टिकवतोय  ..... फक्त भारत माता कि जय बोलून देशावरच प्रेम दाखवता येत असं कोणी सांगितल साहेब ? आज भारताचा एक युवा म्हणून मी जबाबदारीने वागतोय ....या राज्याचा एक पालक म्हणून तुम्ही आपली जबाबदारी पार पाडावी कारण तुम्ही सुज्ञान आहात आणि भावनांच राजकारण करण्यापेक्षा विचारांच स्वच्छंद राजकारण कराल हि अपेक्षा आहे .......धन्यवाद .......



तुषार म्हस्के
९०२९३३३१४७  

https://tusharmhaske.blogspot.com

Friday 5 February 2016

छेड छाड़ हि एक वाईट विकृती आहे.......

छेड छाड़ क्यों ? मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक .... खरोखर हे नाटक नसून..हाजीवन जगत असताना घडत असणारा प्रसंग.... कारण , छेड छाड़ हि एक वाईट विकृती आहे .....आणि हे नाटक


आपल्या ला त्या विकृतींचा सामना करून ....त्याना सामोरे जावून .....या सत्ता धारी समजामध्ये अभिमानाने जगायला शिकवते ......अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर ,कोमल खामकर यांनी या विकृती ला उखाडून काढण्यासाठी आणि तरुणाईला दिशा देण्यासाठी सुरुवात केली .......थियेटर ऑफ रिलेवंस च्या सहवासात आल्यापासून हे नाटक मी  आता पर्यंत पाहिले नव्हते .... आणि शो पाहिल्या नंतर हा क्षण  माझ्या साठी ऐतिहासिक राहिला ......नाटक पाहून घरी आल्यानंतर झोपलो आणि त्यानंतर मनामध्ये हे छेड छाड़ का ? हा प्रश्न सतत येत राहिला ......
नाटक पाहण्यासाठी मी पहिल्यांदा सर्वात शेवटी सर्वांच्या मागे उभा होतो ....रयत शिक्षण संस्थचे हे महाविद्यालय ....आज सरांसोबत या चळवळीचा हिस्सा होण्यासाठी आलो ..... खर तर , मी या चळवळीची सुरुवात करताना असायला हवं होत .....हिच गोष्ट मनाला खात असते .....याची खंत मनात राहून गेली आहे ....अखेर .मी स्वतः शी निर्धार केला ....यापुढील प्रवासाला मी .या चळवळीत असेल आणि या चळवळीला पुढे घेऊन जाईल असं ठरवलं .... या प्रोसेस मधून जाताना मुलांना आलेले अनुभव आणि मंचावर सादरीकरण यांची सांगड घालत असताना त्यांच्या मध्ये झालेले बदल हे अविस्मरणीय राहिले ...आज ज्यांचा स्वतावर विश्वास नव्हता ते विद्यार्थी चालण्यात ,बोलण्यात ,आणि वागण्यात एकदम खुलले होते .....हे त्यांचे व्यक्ती गत अनुभव ऐकत असताना थोडा भारावलो होतो ......त्वरीत असं काही सुचत नव्हत

आता काय बोलू .....आज आपण बसतो ते ठिकाण सोडून ते कलाकाराच्या भूमिकेत होते....प्रत्येक कलाकाराने त्याचे व्यक्तीगत आणि ग्रुप बरोबर काम करताना अनुभव सांगून झाल्यानंतर .....आजचा जवान हा रणभूमीवर लढण्यासाठी निघाला .....३००० ते ३५०० पर्यंत विध्यार्थी संख्या असणाऱ्या या विद्यापीठामध्ये त्यांच्या समोर हा प्रयोग म्हणजे.एका क्रांतीची सुरुवात वाटू लागली .....छेड छाड़ हा विषय घेऊन स्वतामध्ये दिव्य ज्योत पेटवून हे शिलेदार आज तलवार घेऊन मंचावर अवतरले ...आणि क्रांतीची सुरुवात झाली ......

.छेड छाड़ क्योँ ? अत्याच्यार क्यों ? हिंसाचार क्यों ? चा आवाज आला ....त्यामध्ये ढोल चां आवाज आणि कलाकारांच्या प्रत्येक अवयवातून येणारे हे संवाद शेवट पर्यंत पोहचत होते .....कलाकाराच्या अंगामधून बाहेर पडणारे भाव अगदी मनाला खेचत होते .....हृदयात भिडत होते .....हि गर्दी .......शो मध्ये मुलगा ज्यावेळी संवाद करत असतो त्यावेळी मुले खुश होऊन जायची ....आणि त्याच्या या विकृतीवर ज्यावेळी मुलगी कलाकार उठून बोलायची त्यावेळी मुलांच्या सन करून कानाखाली बसून जायची ....आणि क्षणात सुरु असणारा गोंधळ शांत होऊन जायचा ......नाटकातील दृश्य हे बिंबानुसार बदलत जाणारे .... त्यातच कलाकाराच्या शरीरातील छोट्या छोट्या बारीक मूव .....लगेच हृदयात भिडत होते .....या नाटकाची विशेष ओळख म्हणजे हे नाटक निर्णय घेण्यास भाग पाडतो ......आणि या एक सत्ता पुरुषप्रधान संस्कृती मध्ये ती नारी उभी राहते ....आणि बोलते माझा निर्णय मी घेणार .... वा , जबरदस्त आणि ती आपल्या स्वताची नवीन ओळख करून देते .....नाटक पाहत असताना सुरुवातीला आलेली गर्दी आणि त्यांचा होणारा आवाज हा शांत झालेला आणि शेवटी – शेवटी प्रेक्षक एकटक ...एकाग्रतेने रंगमंचावर कलाकारांकडे पाहत होते ......
हे सादरीकरण झाल्यानंतर कलाकारांना ज्यावेळी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाच तेज .......प्रसन्नता देणारे होते ...... कलाकार बोलत होता ...आज मी विश्व जिंकायला सुरुवात केली आहे आणि त्याची एक बाजू म्हणजे छेड छाड क्यों ? ….हि चळवळ आहे ......हे सर्व पाहत असताना माझ्या तोंडामधून एकही शब्द फुटत नव्हता मी फक्त पाहत होतो .......आणि मनामध्ये हा या चळवळीचा पहिला अनुभव साठवून ठेवून आणि हि चळवळ पढे घेऊन जाण्याचा निर्धार केला ....





तुषार म्हस्के
अनुभव : दिनांक 3 फेब्रुवारी 2016
(महात्मा फुले कला, विज्ञान व् वाणिज्य महाविद्यालय पनवेल, जिल्हा रायगड )

Monday 25 January 2016

एक प्रवास अध्यात्मिक अनुभवाचा .....



अनहद नाद म्हणजे माझ्या अंतर्मनातील नाद .....
आज दिनांक २२ जानेवारी रात्रौ ८.३० वा. शिवाजी नाट्य मंदिर दादर, मुंबई . मंजुळ भारद्वाज यांच लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या अनहद नाद नाटकाची प्रस्तुती ....


आज मी पाहतो तर माझ्या जीवनाची हि यात्रा मला आज समाधानाचा श्वास घेण्यासाठी उस्फुर्त करणारी  .....
आता पर्यंत विद्रोहाच्या मनस्थिती मध्ये जगणारी माझी मनोवस्था आज एकदम शांत मुद्रेत मला दिसू लागली . मनाला सुख आणि समाधान मिळण्यासाठी तत्वांचा विस्तार होणं खूप गरजेचं असतं. आज ते तत्व मी माझ्या व्यवहारिक जीवनात रुजवण्यास सुरुवात केली आहे.


आज प्रत्येक कलाकार एकमेकांचे vibrations समजून घेत, एकमेकांना आपल्या नादात सामावून घेऊन, त्यांचा स्वतःचा नाद ऐकत होते. रिहर्सल ला सार्वजण भेटलो आणि पाहिलं तर, प्रत्येक कलाकार एक तेजोमय प्रकाशाचा झोत आणि त्याची यात्रा घेऊन फिरत आहे ....
अनहद नाद च्या show अगोदर झालेल्या ३ दिवसीय कार्य शाळेत विचारांचं मंथन करून निघालेले कलाकार आज त्या काजव्यांसारखे चमकत होते .... एक सुंदर अशी यात्रा.... हवी हवीशी वाटणारी ,मनात तेज निर्माण करणारी , मनाला शांतता  देणारी, माझी मला वाटू लागली.

आज शब्द हि खेळू लागले.... अगदि सहजतेने कालाकारांच्या वाणीतून झळकू लागले... रोमारोमात संचार करणारे शब्द आज शिवाजी मंदिरात घुमू लागले ....आज कोणाला दाखवायचा म्हणून performance नव्हता . आज स्वतःसाठी आम्ही perform करत होतो .

रिहर्सल करून आल्यानंतर आम्ही लगेच तयार होऊन रंगमंचावर रंगमंचाशी connect होण्यासाठी आलो .... अगदी सहजपणे.... माझी जबाबदारी मला माहिती असल्यामुळे रंगमंचावर बाहेर आलेले खिळे हातोडीने आत ठोकण्यास सुरुवात केली .... लगेच माझ्या बरोबर असणारे कलाकार हि कामाला लागले . शिवाजी नाट्य मंदिर च्या रंगमचावर पाहिल्यानंतर मनाला खूप चिंता आणि भीती वाटते .... एक सच्चा कलाकार रंगमंचाला आपली कर्म भूमी, आपली माता समजतो त्याच रंगमंचावर पाहिल्यानंतर तिथे कुठे खिळे वर आलेले, कुठे सेट चा वापर करून स्वतःला व्यावसायिक नाटककार समजणाऱ्या नाटककारांनी त्या रंगभूमीचा हवा तेवढा वापर करून सोडला आहे ..... कला हि स्वतःमध्ये परिपूर्ण असते .... मग जर प्रत्येक कलाकार स्वतःला कलाकार समजत असेल तर तो अशा पद्धतीने सेट design का नाही करत ज्या मुळे आपण perform करत असणाऱ्या रंगमंचाला काहीच ठोकाठाकी न करता त्यावर performance करता येईल .....? त्या कर्मभूमीला पाहिलं आणि डोळे पाणावलेले ....ती आग मनामध्ये सतत जळत राहते .

आजची अनहद नाद ची प्रस्तुती म्हणजे एक विलक्षण प्रयोग आहे हे सातत्याने जाणवत होते. रंगमंचावर झोपल्यानंतर humming आणि आलाप करण्यास सुरुवात केली आज माझा आवाज हा माझ्या ब्रम्हांडा मध्ये गुंजायमान होताना जाणवू लागला एका सुरामध्ये सूर , एका नादा मध्ये नाद..... अनहद चा प्रत्येक कलाकार एकमेकांच्या नाभी शी झोडलेला आहे आणि ते एकमेकांना अखंड विश्वा मध्ये एकमेकांशी एका चेतनेने बांधालेले आहेत हे दिसू लागले .....आज मी एकदम शांत होतो. मनामध्ये अजिबात ओझं नव्हतं. ना कोणता भाव होता, ना काशाचं दडपण होतं.... आज मी उन्मुक्त पणे performance करत होतो .... 



आज योगिनी विलक्षण तेजामध्ये दिसत होती. एकमेकांचा हात पकडून एकमेकांना उर्जा पास करत होती .... आज अश्विनी एक aura घेऊन फिरत होती .... आज प्रत्येक कलाकार एकमेकांना ऊर्जा पास करत होता .... पहिली बेल वाजली आणि आम्ही कलाकार आपली चेतना जागी करून perfomance करण्यासाठी तयार झालो ....किती महत्वाची गोष्टी असते ना एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला perfomance करण्याअगोदर ऊर्जा पास करतो, आपल्या मध्ये सामावेष्ट करून घेतो आणि आपला रंगकर्म अगदी सहज होऊन जातो ....

आज अध्यात्मिकतेकडे जाणारा performance .....विलक्षण तेजाने नटलेला.... रंगमंचावर प्रवेश करताना एकदम वादळासारखा यायचो आणि सहजतेने perform करायचो आणि पुन्हा विंगेत जायचो. आज ते भाव हे समग्र दृष्टीचे होते. आपल्या व्यावहारिक गोष्टींना एकत्र समजून त्यांच्याबरोबर एक लयाने एकरूप होणे हे विशेष होते .....

नदीच्या सीन ला दगड बनल्यानंतर जाणवत होतं कि नाका तोंडामध्ये पाणी गेलय आणि मी पाण्यातील एक भाग आहे . माझ्या जीवनाची यात्रा हि विचारानुसार बदलणारी …. माझी दृष्टी हि त्यानुसार बदलणारी ....नाटक सुरु असताना आलेली सहजता आणि त्यातून निर्माण झालेली व्यवहारिकता हि एक निपुणता निर्माण करत होती .... त्या क्षणाला वाटू लागले मन आणि शरीर एकत्र perform करत आहेत ....

आज performance झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया :

अध्यात्मा चा अनुभव झाला ......त्या क्षणी मी इथे नव्हतोच .... मी तुमच्याबरोबर रंगमंचावर होतो ....
खूप भन्नाट नाटक आहे ....अशा पद्धतीचा नाटक मी पहिल्यांदा पाहिल ..... मी माझा वाढदिवस आज अनहद नाद पाहून इथे साजरा केला त्याच मला समाधान आहे ...संवाद हृदयाशी भिडत होते ....



या अशा लख लखत्या अनुभवांचं तेज घेऊन प्रेक्षक, म्हणजेच TOR नाट्यसिद्धांता मधील पहिला रंगकर्मी, आपल्या जीवनात विचार ,तत्व ,सत्व घेऊन  जीवन जगण्यासाठी , जीवनाला जगण्यासाठी , विचारांना समजण्यासाठी आयुष्याच्या रंगमंचावर जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा घेऊन निघाला आहे......

तुषार म्हस्के

अनहद नाद - जिथे प्रेक्षक रंगकर्मी बनतो.


नाटक सहसा दृश्याच्या माध्यमातून रंगमंचावर प्रस्तुत होत असते आणि दृश्यागणिक दृश्यातून पुढे जाता जाता कथा आणि संदेश दर्शकांसमोर मांडत असते. पण ‘अनहद नाद’ हे नाटक पारंपारिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर प्रस्तुत नाही होत. 

तसे पाहता रंगमंचावर हे नाटक नाटकाराच्या दृष्टीतून आणि त्याच्या स्वतःच्या विश्लेषणातून उद्भवलेले अनुभव व स्टेटमेंट आणि अभिनेता - अभिनेत्रींच्या भावप्रवण अभिनयाच्या माध्यमातून दृश्यमान होते ,परंतु खरे नाटक हे दर्शकांच्या आत प्रस्तुत होते. कलाकार नाटकाराचे शब्द - आंतरशब्द , त्यांचे भाव - आंतरभाव यांना आपल्या कुशल अभिनयाने रंगमंचावर प्रस्तुत करत होते, परंतु त्या शब्दांचा आणि भावांचा खरा तपशील प्रेक्षागृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या मानवी मनावर आणि हृदय पटल यांवर उमटत होता , जिथे दृश्यही तयार होत होते आणि कथा आपली अर्थपूर्ण परिपूर्णता प्राप्त करत होती. खरं तर नाटक कोणतीही एक कथा सांगत नाही , उलट प्रेक्षागृहातील प्रत्येक प्रेक्षकाच्या आत घडून गेलेल्या आणि घडत असलेल्या कथेला गती देत राहते ,त्याचे पुनरावलोकन करत राहते आणि स्वतः समीक्षक होऊन बघण्याची दृष्टी देते. अशाप्रकारे हे नाटक मंजुल भारद्वाज ह्यांच्या रंग सिद्धांत ‘ थिएटर ऑफ रेलेवंस’ च्या ध्येयाला आकार देते , सिद्ध करते कि प्रथम आणि सर्वात महत्वपूर्ण रंगकर्मी दर्शक आहे.

इथे प्रेक्षागृहात बसलेला प्रेक्षक रंगमंचावर साकार होत असलेल्या दृश्यांना न केवळ पाहतो तर नाटकाराचे शब्द आणि त्या शब्दांच्या सुंदर समायोजनेतून प्रकटलेल्या भावांच्या पट्टीच्या पलीकडे जाऊन स्वतः नाट्य लेखक आणि अभिनेता बनतो आणि आपल्या आपल्या कथांना स्वतः समोर सादर करतो आणि स्वतःच त्याची समीक्षा ही करतो. अश्या प्रकारे मंजुल भारद्वाज यांचे अनहद नाद नाटक पाहणे म्हणजे एका अद्भुत जागतिक अनुभवातून प्रवास करण्याजोगे आहे. हे नाटक न केवळ नाटकांच्या ठराविक मापदंडांना तोडते उलट कोणतीही सीमा नसलेले जग तयार करते. गोस्वामी तुलसी दासांच्या ओळी नुसार " जाकी रही भावना जैसी प्रभू मूरत देखी तिन तैसी".


अनहद नाद मध्ये कोणतीही कथा नाही आहे , तरीही प्रेक्षकांच्या असंख्य कथांची घट्ट विण अतिशय सुंदर पद्धतीने जमली आहे.
अनहद नाद मध्ये कोणतेही पात्र नाही आहे, तरीही दर्शकांच्या जीवनातील सर्व पात्रे सजीव होतात. अनहद नाद मध्ये कोणताही संवाद नाही , तरीही दर्शकांच्या आतील संवादांचे धागे सोडवले जातात.अनहद नाद हा स्वर कानांनी न ऐकला जाणारा आहे, तरीही  प्रेक्षागृहात बसलेले प्रेक्षक त्या स्वरांना न केवळ ऐकतात, तर त्यांच्या उत्तरासाठी अस्वस्थ होतात.

हे निव्वळ नाटक नाही आहे, तर जीवनाला समजण्याची आणि जगण्याची एक अध्यात्मिक यात्रा आहे. हे नाटक " बिन गुरु जान कहाँ से पावे "  च्या  सामर्थ्यावर प्रश्न उठवते आणि दर्शवते की प्रत्येक व्यक्ति हा स्वतःचा गुरु आणि शिष्य आहे. हे नाटक प्रेक्षकांना आपआपल्या चेतना कक्षाच्या द्वाराला खोलण्याकरिता प्रेरित करते, आणि चेतनेच्या पंखांवर स्वार होऊन निसर्ग आणि जीवनाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करते.


ह्या नाटकाची समीक्षा करणे सोप्पे नाही कारण हे प्रत्येक प्रेक्षकाला एका समीक्षकाची दृष्टी देते. कलाकारांमध्ये योगिनी चौकने अद्भुत काम केले आहे, तिची संवादफेक आणि भावमुद्रा रसपूर्ण आहे, रससिक्त आहे..रसांमध्ये संमिश्र आहे. अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर आणि तुषार म्हस्के ह्यांनी अप्रतिम साथ निभावली आहे.
मंजुल भारद्वाज एक नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून अत्यंत यशस्वी ठरले आहेत.


(२२ जानेवारी २०१६ , शुक्रवार रात्रौ ८.३० वाजता , " शिवाजी नाट्य मंदिर " मुंबई मधील प्रस्तुतीची समीक्षा )
धनंजय कुमार
304, सुकांत को. ऑ. हा. सोसायटी, 
सेक्टर-3, आरडीपी-8, चारकोप, 
कांदिवली(प), मुम्बई- 40067. 
मोबाइल – 08080012313.
---------------------------------